शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

३० गुंठे द्राक्षातून २२ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:00 IST

जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उगले यांचा द्राक्ष शेतीचा प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरत आहे.उगले यांनी काही वर्षांपूर्वी धारकल्याण येथे दोन एकर द्राक्षाची लागवड केली. हळूहळू अनुभवातून उगले यांनी द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे दहा एकर द्राक्ष क्षेत्र आहे. द्राक्ष बागांचे आगार समजल्या जाणाºया कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांनाही त्यांनी मागे टाकले आहे. सदानंंद उगले यांच्या प्रेरणेतून धारकल्याण गावात सध्या साडेचारशे एकरवर द्राक्ष लागवड झाली. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार औषधांची फवारणी करून नियोजन करावे लागते, असे उगले यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्षाचा हंगाम शक्यतो पूर्णत्वास येतो. परंतु, सदानंद उगले यांनी स्वत:चे प्रयोग करीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष विक्रीस ठेवल्याने त्यांना आर्थिक लाभ झाला. त्यांनी दहा एकर द्राक्ष बागेच्या छाटणीचे केलेले नियोजन साधारण आक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत १० ते १५ दिवसाच्या अंतराने छाटणी केली. ज्या पाऊण एकर द्राक्ष बागेतून त्यांनी बावीस लाख रूपये मिळविले. त्या बागेची छाटणी नोव्हेंबरच्या शेवटी घेतल्याने त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अवघ्या ७५० वेलीपासून सुमारे ३० टन द्राक्ष त्यांना मिळाले. याची विक्री त्यांनी जबलपूर येथील व्यापाºयास प्रतिकिलो ७५ रूपये दराने केली. एका वेलीवर ४० ते ४२ द्राक्षाचे उत्पादन मिळाले. सध्या कडवंची, नंदापूर परिसरात द्राक्ष हंगाम संपत आला असताना उगले यांच्या द्राक्षांची विक्री सुरू आहे.रासायनिक शेतीला सेंद्रीय शेतीची मोठी जोड दिल्यामुळेच उच्चांकी उत्पादन आणि उच्चांकी भाव मिळाल्याचे उगले सांगतात.शेणखता बरोबरच जनावरांचे मलमूत्र एका हौदात साठवून ते द्राक्ष बागेस वेळोवेळी दिले जाते. द्राक्ष बागेचा एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च वजा करून पाऊण एकरातून निव्वळ नफा २० लाख रूपये मिळाला. उर्वरित द्राक्ष बागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे. जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून त्यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिकर शेतीला फाटा देतपाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसेच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने उगले यांना चांगला फायदा झाला आहे. द्राक्ष बागेतून त्यांना वर्षभरात सुमारे ८० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उगले यांना द्राक्ष शेतीसाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली आहे.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी