शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

३० गुंठे द्राक्षातून २२ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:00 IST

जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उगले यांचा द्राक्ष शेतीचा प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरत आहे.उगले यांनी काही वर्षांपूर्वी धारकल्याण येथे दोन एकर द्राक्षाची लागवड केली. हळूहळू अनुभवातून उगले यांनी द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे दहा एकर द्राक्ष क्षेत्र आहे. द्राक्ष बागांचे आगार समजल्या जाणाºया कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांनाही त्यांनी मागे टाकले आहे. सदानंंद उगले यांच्या प्रेरणेतून धारकल्याण गावात सध्या साडेचारशे एकरवर द्राक्ष लागवड झाली. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार औषधांची फवारणी करून नियोजन करावे लागते, असे उगले यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्षाचा हंगाम शक्यतो पूर्णत्वास येतो. परंतु, सदानंद उगले यांनी स्वत:चे प्रयोग करीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष विक्रीस ठेवल्याने त्यांना आर्थिक लाभ झाला. त्यांनी दहा एकर द्राक्ष बागेच्या छाटणीचे केलेले नियोजन साधारण आक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत १० ते १५ दिवसाच्या अंतराने छाटणी केली. ज्या पाऊण एकर द्राक्ष बागेतून त्यांनी बावीस लाख रूपये मिळविले. त्या बागेची छाटणी नोव्हेंबरच्या शेवटी घेतल्याने त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अवघ्या ७५० वेलीपासून सुमारे ३० टन द्राक्ष त्यांना मिळाले. याची विक्री त्यांनी जबलपूर येथील व्यापाºयास प्रतिकिलो ७५ रूपये दराने केली. एका वेलीवर ४० ते ४२ द्राक्षाचे उत्पादन मिळाले. सध्या कडवंची, नंदापूर परिसरात द्राक्ष हंगाम संपत आला असताना उगले यांच्या द्राक्षांची विक्री सुरू आहे.रासायनिक शेतीला सेंद्रीय शेतीची मोठी जोड दिल्यामुळेच उच्चांकी उत्पादन आणि उच्चांकी भाव मिळाल्याचे उगले सांगतात.शेणखता बरोबरच जनावरांचे मलमूत्र एका हौदात साठवून ते द्राक्ष बागेस वेळोवेळी दिले जाते. द्राक्ष बागेचा एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च वजा करून पाऊण एकरातून निव्वळ नफा २० लाख रूपये मिळाला. उर्वरित द्राक्ष बागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे. जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून त्यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिकर शेतीला फाटा देतपाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसेच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने उगले यांना चांगला फायदा झाला आहे. द्राक्ष बागेतून त्यांना वर्षभरात सुमारे ८० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उगले यांना द्राक्ष शेतीसाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली आहे.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी