शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

३० गुंठे द्राक्षातून २२ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:00 IST

जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उगले यांचा द्राक्ष शेतीचा प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरत आहे.उगले यांनी काही वर्षांपूर्वी धारकल्याण येथे दोन एकर द्राक्षाची लागवड केली. हळूहळू अनुभवातून उगले यांनी द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे दहा एकर द्राक्ष क्षेत्र आहे. द्राक्ष बागांचे आगार समजल्या जाणाºया कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांनाही त्यांनी मागे टाकले आहे. सदानंंद उगले यांच्या प्रेरणेतून धारकल्याण गावात सध्या साडेचारशे एकरवर द्राक्ष लागवड झाली. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार औषधांची फवारणी करून नियोजन करावे लागते, असे उगले यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्षाचा हंगाम शक्यतो पूर्णत्वास येतो. परंतु, सदानंद उगले यांनी स्वत:चे प्रयोग करीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष विक्रीस ठेवल्याने त्यांना आर्थिक लाभ झाला. त्यांनी दहा एकर द्राक्ष बागेच्या छाटणीचे केलेले नियोजन साधारण आक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत १० ते १५ दिवसाच्या अंतराने छाटणी केली. ज्या पाऊण एकर द्राक्ष बागेतून त्यांनी बावीस लाख रूपये मिळविले. त्या बागेची छाटणी नोव्हेंबरच्या शेवटी घेतल्याने त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अवघ्या ७५० वेलीपासून सुमारे ३० टन द्राक्ष त्यांना मिळाले. याची विक्री त्यांनी जबलपूर येथील व्यापाºयास प्रतिकिलो ७५ रूपये दराने केली. एका वेलीवर ४० ते ४२ द्राक्षाचे उत्पादन मिळाले. सध्या कडवंची, नंदापूर परिसरात द्राक्ष हंगाम संपत आला असताना उगले यांच्या द्राक्षांची विक्री सुरू आहे.रासायनिक शेतीला सेंद्रीय शेतीची मोठी जोड दिल्यामुळेच उच्चांकी उत्पादन आणि उच्चांकी भाव मिळाल्याचे उगले सांगतात.शेणखता बरोबरच जनावरांचे मलमूत्र एका हौदात साठवून ते द्राक्ष बागेस वेळोवेळी दिले जाते. द्राक्ष बागेचा एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च वजा करून पाऊण एकरातून निव्वळ नफा २० लाख रूपये मिळाला. उर्वरित द्राक्ष बागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे. जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून त्यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिकर शेतीला फाटा देतपाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसेच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने उगले यांना चांगला फायदा झाला आहे. द्राक्ष बागेतून त्यांना वर्षभरात सुमारे ८० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उगले यांना द्राक्ष शेतीसाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली आहे.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी