शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

३० गुंठे द्राक्षातून २२ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 01:00 IST

जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे.

विष्णू वाकडे ।लोकमत न्यूज नेटवर्करामनगर : जालना तालुक्यातील धारकल्याण येथील प्रगतशील शेतकरी सदानंद जगन्नाथ उगले यांनी त्यांच्याकडील पाऊण एकर द्राक्षबागेतून तब्बल बावीस लाखांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे उगले यांचा द्राक्ष शेतीचा प्रयोग अन्य शेतकऱ्यांचे मार्गदर्शक ठरत आहे.उगले यांनी काही वर्षांपूर्वी धारकल्याण येथे दोन एकर द्राक्षाची लागवड केली. हळूहळू अनुभवातून उगले यांनी द्राक्ष बागेचे क्षेत्र वाढवले. सध्या त्यांच्याकडे दहा एकर द्राक्ष क्षेत्र आहे. द्राक्ष बागांचे आगार समजल्या जाणाºया कडवंचीतील द्राक्ष उत्पादकांनाही त्यांनी मागे टाकले आहे. सदानंंद उगले यांच्या प्रेरणेतून धारकल्याण गावात सध्या साडेचारशे एकरवर द्राक्ष लागवड झाली. द्राक्ष बागेत काम करताना वातावरणातील बदलाची काळजी घ्यावी लागते. त्यानुसार औषधांची फवारणी करून नियोजन करावे लागते, असे उगले यांनी सांगितले. जानेवारी ते मार्च या दरम्यान द्राक्षाचा हंगाम शक्यतो पूर्णत्वास येतो. परंतु, सदानंद उगले यांनी स्वत:चे प्रयोग करीत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत द्राक्ष विक्रीस ठेवल्याने त्यांना आर्थिक लाभ झाला. त्यांनी दहा एकर द्राक्ष बागेच्या छाटणीचे केलेले नियोजन साधारण आक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत १० ते १५ दिवसाच्या अंतराने छाटणी केली. ज्या पाऊण एकर द्राक्ष बागेतून त्यांनी बावीस लाख रूपये मिळविले. त्या बागेची छाटणी नोव्हेंबरच्या शेवटी घेतल्याने त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे अवघ्या ७५० वेलीपासून सुमारे ३० टन द्राक्ष त्यांना मिळाले. याची विक्री त्यांनी जबलपूर येथील व्यापाºयास प्रतिकिलो ७५ रूपये दराने केली. एका वेलीवर ४० ते ४२ द्राक्षाचे उत्पादन मिळाले. सध्या कडवंची, नंदापूर परिसरात द्राक्ष हंगाम संपत आला असताना उगले यांच्या द्राक्षांची विक्री सुरू आहे.रासायनिक शेतीला सेंद्रीय शेतीची मोठी जोड दिल्यामुळेच उच्चांकी उत्पादन आणि उच्चांकी भाव मिळाल्याचे उगले सांगतात.शेणखता बरोबरच जनावरांचे मलमूत्र एका हौदात साठवून ते द्राक्ष बागेस वेळोवेळी दिले जाते. द्राक्ष बागेचा एकरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च वजा करून पाऊण एकरातून निव्वळ नफा २० लाख रूपये मिळाला. उर्वरित द्राक्ष बागेतून त्यांना भरघोस उत्पन्न मिळणार आहे. जिद्द, टिकाटी, जिज्ञासू वृत्ती आणि कठोर परिश्रम या माध्यमातून त्यांनी शेतीत क्रांती केली आहे. त्यासाठी पारंपिकर शेतीला फाटा देतपाणी, खत आणि मशागतीचे योग्य व्यवथापन, तसेच मिळेल तेथून नवीन गोष्ट शिकवून तो प्रयोग शेतीत करण्यास प्राधान्य दिल्याने उगले यांना चांगला फायदा झाला आहे. द्राक्ष बागेतून त्यांना वर्षभरात सुमारे ८० लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. उगले यांना द्राक्ष शेतीसाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांची चांगली साथ मिळाल्याने उत्पादनात भर पडली आहे.

टॅग्स :fruitsफळेFarmerशेतकरी