शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

अनुदान वाटपात जालना जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:03 IST

जालना जिल्हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५१ जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाईच्या चटक्यामुळे पाणी बचतीचे महत्त्व उमगलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला यावर्षी प्राधान्य दिले. त्यामुळे जालना जिल्हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५१ जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात अहमदनगर दुसऱ्या तर नाशिक तिस-या स्थानी आहे.पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावर्षी जास्त शेतकºयांनी कृषी विभागाकडे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी मागणी नोंदविली. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ७५१ शेतकºयांना २३ कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत पर्जन्याचे असमान वितरण असल्याने पाणीटंचाईच्या क्षेत्राचा दरवर्षी विस्तार होत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, विभागातील निम्म्याहून अधिक तालुक्यांतील भूजलपातळी तीन मीटरपर्यंत खालावली आहे.पाणीटंचाईचा परिणाम विभागातील सिंचनावर झाला आहे. पावसाच्या पाण्याचा साठा करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी आता जिल्ह्यातील शेतकरी स्वत:हून पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याच्या वापरात काटकसर करता येत असल्याने शेतक-यांचा ठिबक सिंचनास प्रतिसाद वाढू लागला आहे. जिल्ह्यातील ७ हजार ७५१ शेतक-यांनी शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून आपल्या शेतात ठिबक सिंचन सुविधा उभारली आहे.२३ कोटींचे वितरणपंतप्रधान कृषी सिंचन योजनेत अनुदानासाठी जिल्ह्यातील ३४ हजार १११ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी २१ हजार २५५ अर्जांना पात्र ठरले. त्यातील ७ हजार ७६१ शेतक-यांना २३ कोटी रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधी