शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

अनुदान वाटपात जालना जिल्हा राज्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 01:03 IST

जालना जिल्हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५१ जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाणीटंचाईच्या चटक्यामुळे पाणी बचतीचे महत्त्व उमगलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनाला यावर्षी प्राधान्य दिले. त्यामुळे जालना जिल्हा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अनुदान वाटपात राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७ हजार ७५१ जणांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. यात अहमदनगर दुसऱ्या तर नाशिक तिस-या स्थानी आहे.पंतप्रधान कृषी सिंचन योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावर्षी जास्त शेतकºयांनी कृषी विभागाकडे ठिबक सिंचनाच्या अनुदानासाठी मागणी नोंदविली. आतापर्यंत जिल्ह्यातील ७ हजार ७५१ शेतकºयांना २३ कोटी रुपयांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यात बहुतांश तालुक्यांत पर्जन्याचे असमान वितरण असल्याने पाणीटंचाईच्या क्षेत्राचा दरवर्षी विस्तार होत आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, विभागातील निम्म्याहून अधिक तालुक्यांतील भूजलपातळी तीन मीटरपर्यंत खालावली आहे.पाणीटंचाईचा परिणाम विभागातील सिंचनावर झाला आहे. पावसाच्या पाण्याचा साठा करणे आणि पाण्याची बचत करण्यासाठी आता जिल्ह्यातील शेतकरी स्वत:हून पुढाकार घेत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठिबक सिंचनामुळे पाण्याच्या वापरात काटकसर करता येत असल्याने शेतक-यांचा ठिबक सिंचनास प्रतिसाद वाढू लागला आहे. जिल्ह्यातील ७ हजार ७५१ शेतक-यांनी शासनाच्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतून आपल्या शेतात ठिबक सिंचन सुविधा उभारली आहे.२३ कोटींचे वितरणपंतप्रधान कृषी सिंचन योजनेत अनुदानासाठी जिल्ह्यातील ३४ हजार १११ शेतक-यांनी आॅनलाइन नोंदणी केली. त्यापैकी २१ हजार २५५ अर्जांना पात्र ठरले. त्यातील ७ हजार ७६१ शेतक-यांना २३ कोटी रुपयांचे अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाfundsनिधी