शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

ग्रामपंचायत सदस्य सहलीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:03 IST

वालसावंगी : येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी पॅनल प्रमुखांनी आपापले ...

वालसावंगी : येथील ग्रामपंचायतीचे सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण होऊ नये, यासाठी पॅनल प्रमुखांनी आपापले सदस्य सहलीवर पाठविले आहेत. त्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी ग्रामपंचायत निवडणूक मोठी चुरशीची झाली. चौपाल विकास पॅनल विरुद्ध भाजपा-राष्ट्रवादीने एकत्रित येत लढा दिला. १७ पैकी दहा सदस्य राष्ट्रवादी-भाजपाचे विजयी झाले. त्यांच्याकडे बहुमत आलेले आहे, तर चौपाल पॅनलचे सात सदस्य विजयी झाले आहेत. त्यांना बहुमतासाठी दोन सदस्यांची गरज आहे. त्यात सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे दोन्ही पॅलनकडून सरपंच आमचाच होणार असे सांगितले जात आहे. अनेक नूतन सदस्य सध्या सहलीवर आहेत. एका गटाकडे असलेले बहुमत आणि दुसऱ्या गटाकडे कमी असलेले दोन सदस्य यात सरपंचपद कोणत्या गटाकडे जाणार, ऐन वेळी कोणती राजकीय खेळी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.