शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आजपासून ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:27 IST

या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवाराला मोठे महत्त्व असते. पॅनल उभे करून ही निवडणूक लढविली जाते. त्यामुळे पॅनलमध्ये कोण ...

या निवडणुकीत राजकीय पक्षापेक्षा वैयक्तिक उमेदवाराला मोठे महत्त्व असते. पॅनल उभे करून ही निवडणूक लढविली जाते. त्यामुळे पॅनलमध्ये कोण कोण असावे, हे जवळपास आता निश्चित झाले असून, त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत जवळपास सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होत असल्याने एकाच पक्षातील उमेदवार हे अन्य वेगवेगळ्या पॅनलमध्ये राहणार असल्याने याला पक्ष पातळीवर फारसे महत्त्व नसते. निवडणुकांचे निकाल लागल्यावर ज्या पॅनलमध्ये ज्या राजकीय पक्षांचे उमेदवार जास्त असतात त्या पक्षाच्या ताब्यात ती ग्रामपंचायत आली असे मानले जाते. त्यामुळे राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते या निवडणुकीत प्रत्यक्ष प्रचारात उतरत नसले तरी त्यांच्या सांगण्यावरूनच पॅनलची निश्चिती केली जात असल्याचे दिसून येते.

यंदाच्या या निवडणुका महाविकास आघाडीविरुद्ध भाजप अशाच राहणार असल्याने याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रशासनाकडून जय्यत तयारी

जालना जिल्ह्यात आठ तालुक्यांसाठी तहसील तसेच काही ठिकाणी अन्यत्र उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. जाफराबाद तालुका वगळता अन्य सर्व सातही तालुक्यांत २७ निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांना मदत करण्यासाठी सहायक निवडणूक अधिकारी म्हणूनदेखील २७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असल्याचे निवडणूक विभागाने सांगितले.

थेट निधी येणार असल्याने रंगत वाढली

पंचायत राज योजनेनुसार आता निधींचे वाटप हे त्या-त्या ग्रामपंचायतींच्या लोकसंख्येप्रमाणे निधी विकास कामांसाठी मिळणार आहे. त्यामुळे पंधराव्या वित्त अयोगानुसार हा निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि विशेषकरून तरुणांचा या निवडणुकीत मोठा सहभाग राहील, असे दिसून येते. या निवडणुका कोरोनाच्या काळात होणार असल्याने सर्व ती खबरदारी घेण्याचे बंधन अत्यंत कडक राहणार आहे.