शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

"सरकार आश्वासने देवून वेळकाढू भूमिका पार पाडते, आरक्षण देणार असाल तर पुढचे ठरवू"

By विजय मुंडे  | Updated: November 1, 2023 14:52 IST

सरसकट आरक्षण देणार असाल तर वेळ देण्यावर विचार करू: मनोज जरांगे पाटील

जालना : शासन म्हणते चर्चा करू. चर्चा करायची असेल तर इथं या. वेळ कशासाठी पाहिजे, किती पाहिजे आणि महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसीतून आरक्षण देणार का ते सांगा. ते सांगितल्यानंतर आम्ही ठरवू वेळ द्यायचा की नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

सर्वपक्षीय बैठक आणि शासनाच्या निर्णयाबाबत जरांगे पाटील यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधून भूमिका मांडली. सरकार आश्वासने देवून वेळ काढू भूमिका पार पाडत आहे. सर्वपक्षीयांची यापूर्वीही बैठक झाली होती. तीच बैठक पुन्हा झाली. बैठकीनंतर आणखी वेळ पाहिजे, असे सांगत आहेत. परंतु, वेळ किती पाहिजे, कशाला पाहिजे आणि सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणार का ते सांगा. मग आम्ही मराठा समाजाशी चर्चा करून वेळ द्यायचा की नाही, ते सांगू, असेही जरांगे पाटील म्हणाले.

अरे-तुरे बोलले की वाईट वाटते कामराठा समाजातील युवकांचे मुडदे पडत आहेत. युवकांचे करिअर बरबाद होत आहे. परंतु, तुम्हाला वाईट वाटत नाही. परंतु, अरे-तुरे केले काही बोलले की तुम्हाला वाईट वाटते का असा प्रश्न जरांगे पाटील यांनी केला. यापुढे काही दिवस आपण स्वभावात बदल करू, त्यांना गोड बोलू, असेही ते म्हणाले.

आमचा आवाज कोणी दाबू शकत नाहीमराठ्यांचा आणि माझा आवाज कोणी दाबू शकत नाहीत. दुसऱ्या टप्प्यातील हे आरक्षण आंदोलन सुरू आहे. तिसरा आणि चौथा टप्पा बाकी आहे. मीडियाचा आवाज, आमचा आवाज बंद पडू देणार नाहीत. आमच्यावर अन्याय होवू देणार नाहीत आणि आपणही मराठा आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असेही जरांगे पाटील म्हणाले.

ही आरपारची लढाई : जरांगे पाटीलइंटरनेट बंद करण्यामागे शासनाचे षडयंत्र असू शकते. तुम्ही कितीही षडयंत्र करा आम्ही तुमच्या नेटवर चालणारे नाहीत. नेट बंद करून राज्याचे वातावरण दूषित करू नका. ही लढाई आरपारची आहे. आम्ही शांततेत आंदोलन करून लढू आणि आरक्षण मिळवू, असेेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना