शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

"सरकारला शेवटची संधी"; मनोज जरांगेंचा उपोषण सुरू करण्यापूर्वी निर्वाणीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 16:13 IST

मनोज जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील.

- पवन पवार वडीगोद्री (जालना): "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही."; असा निर्वाणीचा इशारा सरकारला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत असलेले जरांगे यांनी आज रात्री पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणामुळे सरकारवर तातडीने काही निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील. त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका करत, राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे. यासाठी शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचे काम पुन्हा सुरू करावे. तसेच, आंदोलकांवरील सर्व गुन्हे माफ करण्यात यावेत, अशा मागण्या केल्या. 

जरांगे पाटील भाजपच्या मराठा नेत्यांनाही इशारा दिला की, "जर आरक्षण दिलं नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जाईल. मराठा समाजाने राजकारणाचा भाग न होता आपले ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे." जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, भुजबळ वयाच्या अखेरीस चुकीचे काम करत आहेत. त्यांनी धनगर समाजाला सांगितले की, "तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. छगन भुजबळ यांच्या भडकावण्याला बळी पडू नका." आम्हाला राजकारणात जायचे नाही, मात्र समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी हा लढा उभारला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

सरकारला अखेरचा इशारा अन् हे शेवटचे उपोषणजरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल. "रात्री १२ किंवा १ वाजता आमरण उपोषण सुरु करत आहोत. हे शेवटचे आंदोलन असेल, आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला बोंबलत बसावं लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना