शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

जलयुक्त शिवार योजनेच्या पुरस्काराचा शासनाला विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:12 AM

जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.

बाबासाहेब म्हस्के ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जलयुक्त शिवार अभियानांच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या संस्था, गावे व व्यक्तींना शासनाने गाजावाजा करून पुरस्कार जाहीर केले. मात्र, सहा महिने उलटूनही या पुरस्कारांचे वितरण न झाल्याने अभियानात सहभागी गावांचा उत्साह कमी होत आहे.जलयुक्त शिवार अभियाना या महत्त्वाकांक्षी योजनेत लोकसहभाग वाढावा, गावागावांमध्ये स्पर्धात्मक वातावरण तयार व्हावे या उद्देशाने राज्यशासनाने महात्मा ज्योतिबा फुले, राजामता जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जलमित्र पुरस्कार देण्याचे जाहीर केले. राज्यभरातून या पुरस्कारांसाठी राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर प्रस्ताव मागविण्यात आले. अभियानाच्या पहिल्या वर्षात (वर्ष २०१५-१६) मध्ये जिल्ह्यातील २१२ गावांमध्ये जलसंधारणाची कामे झाली. या कामांमुळे पाणीपातळीमध्ये वाढ झाली. अनेक गावांमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, सिंचन क्षेत्रही वाढले. दरम्यान, या अभियानात उत्तम काम करणारी गावे, संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यासाठी शासनाने पुरस्कारासाठी प्रस्ताव मागितले. अनेक गावांनी जिल्हास्तरीय समितीकडे आपले प्रस्ताव सादर केले. समितीने प्राप्त प्रस्तावांचे मूल्यांकन करून शासनाला अहवाल सादर केला. यामध्ये मंठा तालुक्यातील किनखेडा (ता.मंठा) गावाने केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत शासनाने एक लाख रुपयांचा प्रथम तर जालना तालुक्याला पाच लाखांचा प्रथम पुरस्कार जाहीर केला. त्याचबरोबर जालना तालुक्यातील सामनगाव, अंबड तालुक्यातील दुनगाव, बदनापुरातील म्हात्रेवाडी आणि घनसावंगीमधील गुरुपिंप्री या गावांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय, चतुर्थ व पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाले. अभियानात योगदान देणाºया सामाजिक संस्था व व्यक्तींनाही पुरस्कार जाहीर करण्यात आले. जालना येथे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यासाठी २२ नोव्हेंबर २०१७ निश्चित करण्यात आली. मात्र, २२ नोव्हेंबर २०१७ रोजी जलसंधारण मंत्री अपरिहार्य कारणामुळे आलेच नाहीत. त्यामुळे लवकरच या पुरस्कारांचे वितरण केले जाईल, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र, सहा महिने उलटूनही पुरस्काराचे वितरण झालेच नाही. त्यामुळे पुरस्कारप्राप्त गावांमध्ये नाराजीची भावना असून, अभियानाच्या दुसºया, तिसºया टप्प्यात सहभागी गावांचा उत्साह मावळत आहे. महापुरुषांच्या नावाने जाहीर केलेल्या पुरस्कारांचे वितरणच करायचे नाही याबद्दल किनखेडा ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाWaterपाणी