शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकारला विसर; गोदाकाठच्या गावांचा पुन्हा उपोषणाचा एल्गार

By महेश गायकवाड  | Updated: March 27, 2023 19:48 IST

वडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या.

जालना : मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या १४ मागण्या शासनाने मान्य केल्या. परंतु, त्यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सकल मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला असून, सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेण्यासाठी जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ८३ गावांनी वडीकाळ्या गावात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाला सोमवारी निवेदन देण्यात आले.

५ फेब्रुवारीपासून वडीकाळ्या गावात गोदाकाठच्या गावांनी आमरण उपोषण सुरू केले होते. संपूर्ण वडीकाळ्या गाव यात सहभागी झाले होते. त्यावेळेस सरकारने तत्काळ १४ मागण्या मंजूर केल्या होत्या. या सर्व १४ मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, दोन महिन्यानंतरही एकाही निर्णयाची सरकारने अंमलबजावणी केली नाही. सरकारने मंजूर केलेल्या १४ मागण्यांची २९ मार्च २०२३ पूर्वी अंमलबजावणी न केल्यास जालना आणि बीड जिल्ह्यातील ८३ गावांच्या वतीने ३० मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या मागण्या सरकारने केल्या होत्या मंजूरवडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या. यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय, ओबीसी समाजाप्रमाणे शैक्षणिक व शासकीय नोकरीत सवलत, प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेचे उपकेंद्र, कोपर्डी खटल्याचा निकाल, मराठा आरक्षणासाठी न्यायालयात सक्षम बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती यासह अन्य मागण्यांचा त्यात समावेश होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना