शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
3
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
4
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
5
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
6
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
7
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
8
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
9
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
10
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
11
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
12
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
13
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
14
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
15
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
16
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
17
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
18
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
19
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
20
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाच्या मागण्यांचा सरकारला विसर; गोदाकाठच्या गावांचा पुन्हा उपोषणाचा एल्गार

By महेश गायकवाड  | Updated: March 27, 2023 19:48 IST

वडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या.

जालना : मराठा आरक्षणासह समाजाच्या अन्य मागण्यांसाठी फेब्रुवारी महिन्यात उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या १४ मागण्या शासनाने मान्य केल्या. परंतु, त्यातील एकाही निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे सकल मराठा समाजामध्ये रोष निर्माण झाला असून, सरकारविरोधात पुन्हा आक्रमक भूमिका घेण्यासाठी जालना आणि बीड जिल्ह्यातील गोदाकाठच्या ८३ गावांनी वडीकाळ्या गावात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात तहसील कार्यालयाला सोमवारी निवेदन देण्यात आले.

५ फेब्रुवारीपासून वडीकाळ्या गावात गोदाकाठच्या गावांनी आमरण उपोषण सुरू केले होते. संपूर्ण वडीकाळ्या गाव यात सहभागी झाले होते. त्यावेळेस सरकारने तत्काळ १४ मागण्या मंजूर केल्या होत्या. या सर्व १४ मागण्यांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, दोन महिन्यानंतरही एकाही निर्णयाची सरकारने अंमलबजावणी केली नाही. सरकारने मंजूर केलेल्या १४ मागण्यांची २९ मार्च २०२३ पूर्वी अंमलबजावणी न केल्यास जालना आणि बीड जिल्ह्यातील ८३ गावांच्या वतीने ३० मार्चपासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

या मागण्या सरकारने केल्या होत्या मंजूरवडीकाळ्या गावातील उपाेषणाच्यावेळी सरकारने १४ मागण्या मान्य केल्या होत्या. यात महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र, विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृहाची सोय, ओबीसी समाजाप्रमाणे शैक्षणिक व शासकीय नोकरीत सवलत, प्रत्येक जिल्ह्यात सारथी संस्थेचे उपकेंद्र, कोपर्डी खटल्याचा निकाल, मराठा आरक्षणासाठी न्यायालयात सक्षम बाजू मांडण्यासाठी तज्ज्ञ विधिज्ञांची नियुक्ती यासह अन्य मागण्यांचा त्यात समावेश होता.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणJalanaजालना