शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! रेशीम अंडीपुंज केंद्र ठरणार मराठवाड्यासाठी वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:05 IST

बीड जिल्हा आजघडीला मराठवाड्यात अव्वल असून, तेथे दोन हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रात ही शेती केली जाते

ठळक मुद्देजालन्यात देशातील दुसरे कोष खरेदी केंद्रअंडीपुंज ककेंद्रासाठी २१ कोटी रुपयांची तरतूद

जालना/ औरंगाबाद : अत्यंत कमी पाण्यावर हमखास उत्पादन देणारी शेती म्हणून रेशीम शेतीकडे पाहिले जाते. मराठवाड्यात बीड, औरंगाबाद तसेच जालना आणि परभणी हे जिल्हे यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यातील पहिले अंडीपुंज केंद्र हे औरंगाबाद जिल्ह्यातील चिकलठाणा येथे होत असून, ते मराठवाड्यासाठी वरदान ठरणार आहे. 

महाराष्ट्रात रेशीम शेतीचा प्रारंभ जवळपास पाच दशकांपूर्वी झाला. आजघडीला जवळपास २८ जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणावर रेशीम शेती केली जाते. लहानात लहान शेतकरीदेखील ही शेती अत्यंत कमी पाण्यावर करता येत असल्याने त्याकडे वळला आहे. मध्यंतरी मराठवाड्यातही या रेशीम शेतीसाठी वस्त्र उद्योग विभागाने पुढाकार घेतला होता. नंतर या शेतीचे महत्त्व विशेषकरून ग्रामीण भागातील महिलांना कळल्याने त्या या शेतीकडे वळल्या आहेत. रेशीम निर्मितीसाठी तुतीची लागवड करून त्यातून निघणाऱ्या अळींचे संगोपन तसेच त्यांचे सरंक्षण हे सोप्या पद्धतीने केले जाते. केवळ तापमान वाढीचा आणि कमी होण्याचे तंत्र सांभाळल्यास ही शेती परवडणारी असून, जालना जिल्ह्यात ही शेती जवळपास ९०० एकरपेक्षा अधिक आहे, तर औरंगाबाद जिल्ह्यात ही शेती एक हजार ३०० एकरांवर केली जाते. बीड जिल्हा आजघडीला मराठवाड्यात अव्वल असून, तेथे दोन हजार एकरपेक्षा अधिक क्षेत्रात ही शेती केली जात असल्याची माहिती उपसंचालक प्रादेशिक रेशीम विकास यंत्रणेचे डी. ए. हागे यांनी दिली.

जालन्यात देशातील दुसरे कोष खरेदी केंद्रमहाराष्ट्रातील रेशीम कोष निर्मितीनंतर ते कोष विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी कर्नाटक राज्यातील रामनगर येथे जावे लागत होते; परंतु तीन वर्षांपूर्वी तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, तत्कालीन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खेातकर यांनी पुढाकार घेऊन जालन्यातील कृषी बाजार समितीत महाराष्ट्रातील पहिले रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले. येथे आज या रेशीम कोषाला चांगला भाव मिळत असून, ३७६ रुपये प्रती किलाेने आज कोषाची खरेदी येथे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कर्नाटकला जाण्यासाठीचा मोठा वेळ आणि पैसा वाचला आहे. लवकरच जालन्यात या रेशीम कोष खरेदीसाठी सहा कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे.

अंडीपुंज केंद्र वरदान ठरणारराज्याच्या अर्थसंकल्पात सोमवारी चिकलठाणा येथे अंडीपुंज केंद्र अर्थात ग्रेनेज मंजूर केले आहे. त्यासाठी २१ कोटी रुपयांची तरतूदही केली आहे. येथे यासाठी कोल्डस्टोरेज-शीतगृह उभारण्यात येणार असून, तेथे अंडी उबविली जाणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठीचे शास्त्रोक्त प्रशिक्षण तज्ज्ञांकडून देण्याची व्यवस्थाही येथे होणार असल्याने हे अंडीपुंज केंद्र मराठवाडा विभागासाठी वरदान ठरणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीArjun Khotkarअर्जुन खोतकरMarathwadaमराठवाडा