शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

एक शेळी शेतकऱ्याचे मरण टाळते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:43 IST

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते.

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते. कृषी विद्यापीठातील संशोधनाचा वापर शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश. मला जे गाव मिळाले तिथे लोक मेंढीपालन करायचे. पण, त्यांची पुढची पिढी ते सोडून नोकरीच्या शोधात होती. त्यांची कारणे शोधली तेव्हा सामाजिक अप्रतिष्ठा, हेटाळणीची वागणूक आदी कारणे पाहणीत पुढे आली.नंतर मी अभ्यासक्रम पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत लाखाच्या पगारावर रुजू झालो; पण आपण खत विकण्यासाठी इतके शिकलो का, असा प्रश्न पडायचा. एक दिवस नोकरी सोडली आणि घरी आलो. नोकरी सोडली, आता शेळीपालन करणार असे सांगितले. त्यांचा विरोध सुरू झाला. मी निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे त्यांनी गावातील लोकांना माझी समजूत काढायला लावली. ते यायचे, शेळीपालनातील धोके सांगायचे. मी फक्त ते धोके नोंद केले आणि सुरुवातीलाच प्रतिबंधात्मक उपाय केले. शेतकºयांना मला सांगायचे की, अर्ध्याहून अधिक आयुष्य गावात गेलेले असेल तर तुम्हाला शहरात राहताना गुदमरल्यासारखे होते ना? पण ज्यांचा जन्मच तिथे झालाय ते मस्त राहताहेत. बंदिस्त शेळीपालन करताना हीच खबरदारी घ्यायची की, तीच शेळी वा मेंढी बंदिस्त राहू शकते जिचा जन्म तिथे झालेला असतो. शेळी आणि मेंढी शेतकºयाला आर्थिक बळ देणारा महत्त्वाचा घटक आहे. औरंगाबादमधील एका संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, ज्या घरात एक-दोन शेळ्या-मेंढ्या आहेत, तिथे शेतकरी आत्महत्या झालेली नाही. यामागचे कारण एका महिलेने सांगितले. दोन-चार शेळ्या असतील. आर्थिक चणचण झाली, तर पटकन ती विकता येते. त्यातून आलेल्या पैशांतून एक महिना निघून जातो. शेतकºयांच्या आत्महत्या फार मोठ्या पैशांसाठी होत नाहीत. कधी कधी हजार दोन हजार रुपयांसाठीही शेतकरी गळफास घेतो, अशावेळी एक शेळी शेतकºयाला जीवदान देते. त्यामुळे शेळीपालन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.(शब्दांकन - विकास व्होरकटे)

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी