शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

एक शेळी शेतकऱ्याचे मरण टाळते..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:43 IST

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते.

प्राथमिक शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणही शहरातच झाले. त्यामुळे शेळी-मेंढी यांच्याशी माझा संबंध आला नाही. बीएस्सी. अ‍ॅग्री करताना शेतक-याच्या घरी सहा महिने राहावे लागते. कृषी विद्यापीठातील संशोधनाचा वापर शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्हावा, हा त्यामागचा उद्देश. मला जे गाव मिळाले तिथे लोक मेंढीपालन करायचे. पण, त्यांची पुढची पिढी ते सोडून नोकरीच्या शोधात होती. त्यांची कारणे शोधली तेव्हा सामाजिक अप्रतिष्ठा, हेटाळणीची वागणूक आदी कारणे पाहणीत पुढे आली.नंतर मी अभ्यासक्रम पूर्ण करून एका मोठ्या कंपनीत लाखाच्या पगारावर रुजू झालो; पण आपण खत विकण्यासाठी इतके शिकलो का, असा प्रश्न पडायचा. एक दिवस नोकरी सोडली आणि घरी आलो. नोकरी सोडली, आता शेळीपालन करणार असे सांगितले. त्यांचा विरोध सुरू झाला. मी निर्णयावर ठाम होतो. त्यामुळे त्यांनी गावातील लोकांना माझी समजूत काढायला लावली. ते यायचे, शेळीपालनातील धोके सांगायचे. मी फक्त ते धोके नोंद केले आणि सुरुवातीलाच प्रतिबंधात्मक उपाय केले. शेतकºयांना मला सांगायचे की, अर्ध्याहून अधिक आयुष्य गावात गेलेले असेल तर तुम्हाला शहरात राहताना गुदमरल्यासारखे होते ना? पण ज्यांचा जन्मच तिथे झालाय ते मस्त राहताहेत. बंदिस्त शेळीपालन करताना हीच खबरदारी घ्यायची की, तीच शेळी वा मेंढी बंदिस्त राहू शकते जिचा जन्म तिथे झालेला असतो. शेळी आणि मेंढी शेतकºयाला आर्थिक बळ देणारा महत्त्वाचा घटक आहे. औरंगाबादमधील एका संस्थेने केलेल्या पाहणीत असे आढळून आले की, ज्या घरात एक-दोन शेळ्या-मेंढ्या आहेत, तिथे शेतकरी आत्महत्या झालेली नाही. यामागचे कारण एका महिलेने सांगितले. दोन-चार शेळ्या असतील. आर्थिक चणचण झाली, तर पटकन ती विकता येते. त्यातून आलेल्या पैशांतून एक महिना निघून जातो. शेतकºयांच्या आत्महत्या फार मोठ्या पैशांसाठी होत नाहीत. कधी कधी हजार दोन हजार रुपयांसाठीही शेतकरी गळफास घेतो, अशावेळी एक शेळी शेतकºयाला जीवदान देते. त्यामुळे शेळीपालन शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी महत्त्वाचे आहे.(शब्दांकन - विकास व्होरकटे)

टॅग्स :JalanaजालनाFarmerशेतकरी