शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शाळा, महाविद्यालयांना भेटी द्या; मुलींचे प्रश्न जाणून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 01:11 IST

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत.

विजय मुंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी जिल्हा पोलीस दलांतर्गत कार्यरत विविध विभागासह ठाणे प्रभारींना आपल्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना भेटी देणे, महिला, मुलींचे प्रश्न जाणून घेत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. शिवाय ठाण्यात येणाऱ्या तक्रार अर्जांची शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महिला, मुलींची छेड-छाड रोखण्यासाठी दामिनी पथकासह ठाणेस्तरावरील विविध पथकांनाही सूचना दिल्या आहेत.हैदराबाद येथील अमानवीय घटनेचा जिल्ह्यात सर्वच स्तरातूून निषेध केला जात आहे. महिला, मुलींची होणारी छेडछाड रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी जिल्हा पोलीस दलातील विविध पथकांसह ठाणे प्रभारींना दक्षता व उपाययोजनांबाबत सूचना दिल्या आहेत. शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी दामिनी पथक कार्यरत करण्यात आले आहे. पोउपनि पल्लवी जाधव आणि त्यांचे सहकारी शाळा, महाविद्यालयासह खासगी शिकवणीच्या परिसरात, बाजारपेठेत गस्त घालत आहेत. शिवाय येणा-या तक्रारीनुसार कारवाईही हे पथक करीत आहे. दामिनी पथकासह ठाणेस्तरावरील प्रभारी अधिकाऱ्यांनीही महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. गस्तीवर असलेल्या अधिकारी, कर्मचाºयांनाही शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ, खासगी शिकवणीला भेटी देणे, या परिसरातील टवाळखोरी करणाºयांवर कारवाई करणे, महिला, मुलींकडून येणाºया तक्रारींची तात्काळ दखल घेत शहानिशा करून कारवाई करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिल्या आहेत. शिवाय शाळा, महाविद्यालयातील मुख्याध्यापक, प्राचार्यांच्या बैठका घेऊन महिला, मुलींच्या सुरक्षेबाबत घ्यावयाच्या दक्षतेबाबत सूचना देण्यासही सूचित केले आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालयातील विशाखा समित्यांनीही सतर्क रहावे, याबाबत आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले.महिला, मुलींनी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात, यासाठी १०० व १०९१ हा टोलफ्री क्रमांक २४ तास सेवेत ठेवण्यात आला आहे.ठाणे प्रभारी अधिका-यांनी आपले मोबाईल नंबर शाळा, महाविद्यालयांमध्ये द्यावेत, मुलींशी संवाद साधवा, मुलींनी निर्भयपणे तक्रारी कराव्यात, सुरक्षात्मक वातावरण व्हावे, यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Jalna S Pपोलीस अधीक्षक, जालनाJalna Policeजालना पोलीसWomenमहिलाSchoolशाळाcollegeमहाविद्यालय