शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

परतुरात परप्रांतातून गांजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:39 IST

आंधप्रदेशातून परतूर शहरात गांजाची तस्करी होत असल्याचे विशाखापट्टणम् येथे राज्य सीमा सुरक्षा दलाने सोमवारी केलेल्या कारवाईत समोर आले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : आंधप्रदेशातून परतूर शहरात गांजाची तस्करी होत असल्याचे विशाखापट्टणम् येथे राज्य सीमा सुरक्षा दलाने सोमवारी केलेल्या कारवाईत समोर आले आहे. या कारवाईत एका वाहनासह दोघांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परतूर तालुक्यात अनेक दिवसांपासून गांजाची अवैध विक्री वाढली आहे. विशाखा पट्टणम जवळील चितपल्ली, अंकपल्ली मधगिरी, गासवाटा या गावातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी होते. हा गांजा रेल्वे किंवा चारचाकी वाहनाने परतूर शहरात दाखल होतो. गांजा तस्करी मागे एका राजकीय व्यक्तीचा हात असल्याची शहरात चर्चा रंगली आहे. गांजाची तस्करी सुरू असतानाही पोलीस प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षाबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. विशाखा पट्टणम येथून सोमवारी परतूरकडे येणाऱ्या वाहनाचा सीमा सुरक्षा दलाला संशय आल्याने या वाहनाची तपासणी करण्यात आली. वाहनात गांजा आल्याने वाहनासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. संबंधितांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, तेथील पोलीस अधिक तपासासाठी परतुरात दाखल होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.दरम्यान, गांजा तस्करीतून गतवर्षी एका युवकाचा विशाखापट्टणम भागात खून झाल्याची घटना ताजी आहे. त्यात आता दोघांना पोलिसांनी पकडल्याने या तस्करीवर शिक्कामोर्तब झाले असून, अवैधरीत्या होणारी गांजाची तस्करी रोखण्यासाठी कारवाई मोहीम राबविली जाणार का, हाच प्रश्न आहे.यासंदर्भात पोलिस उपअधीक्षक सोपान बांगर म्हणाले, अरोपी परतूरचे असले तरी ते नेमके गांजा कुठे पुरवठा करत होते, हे माहिती नाही. तिकडच्या पोलिसांकडून माहिती आल्यानंतर संबंधित गुन्ह्याची अधिक माहिती समजेल.

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारीSmugglingतस्करी