शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

गणेश मंडळांनी शिल्लक वर्गणी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 00:23 IST

शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गणेशोत्सव साजरा करताना सार्वजनिक ठिकाणी गणपतीची स्थापना करताना प्रथम त्या मंडळांनी न्यास नोंदणी कार्यालयाकडे रीतसर अर्ज करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. या अंतर्गत जालन्यातील जवळपास १८० गणेश मंडळांनीच ही परवानगी घेतल्याचे दिसून आले. असे असले तरी आता वर्गणीचा हिशोब नीट ठेवून, शिल्लक वर्गणी राहिल्यास त्यातून पूरग्रस्तांना मदतीसाठी ती रक्कम न्यास नोंदणी विभागाकडे सुपूर्द करावी असे आवाहन करण्यात आले आहे.सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून गेल्या काही वर्षापासून न्यास नोंदणी कायद्या अंतर्गत गणेश मंडळांना परवानगी घेणे आणि हिशोब नीट ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. ही बाब गंभीर आहे.आता गणेश उत्सवाची सांगता होत आहे. परंतु भविष्यात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशाची स्थापना करण्यापूर्वी न्यास नोंदणी विभागाची परवानगी तसेच हिशोबाचा ताळेबंद सादर करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.जालन्यात जवळपास १८० गणेश मंडळांनी परवागी घेतल्याचे सांगण्यात आले. गेल्या महिन्यात सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच राज्याच्या अन्य भागात पूराने थैमान घातले आहे. त्यामुळे त्या भागातील गरजूांना आजही मदतीची गरज आहे. ही मदत माणूसकीच्या दृष्टीकोनातून करण्यात येणार असल्याने गणेश मंडळांनी देखील यात उत्स्फूर्त सहभाग नोंदविण्याचे आवाहन येथील सहायक धर्मदाय आयुक्त एस.बी माने आणि कार्यालयीन अधीक्षक आर.डी. पांचाळ यांनी यांनी केले आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवGanesh Mandal 2019गणेश मंडळ 2019Socialसामाजिकfloodपूर