शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

गांधी संदेश दौड; राजेभाऊ ढवळे सेवाग्रामकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम अशी धावण्याची गांधी संदेश दौड प्रारंभीली आहे. बुधवारी सकाळी ६ वा. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी हिरवा झेंडा दाखवून ढवळे यांच्या दौडला प्रारंभ झाला.जुना जालना भागातील गांधी चमन येथे प्रारंभी महात्मा गांधीच्या पुतळ्यास अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जालना ते सेवाग्राम ३०० किलोमीटरचे अंतर ढवळे हे महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण करुन सेवाग्राम येथे या दौडची सांगता करणार आहेत.बुधवारी सकाळी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्य मित्रपरिवारासह अन्य मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यात महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख प्रा. यशवंत सोनुने, वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण उढाण, उपाध्यक्ष दिनेश भोजने, जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, अ‍ॅड. जगदीश बडवे, अ‍ॅड. प्रदीप जाधव, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. किशोर राऊत, अ‍ॅड. सतीश तवरावाला, अ‍ॅड. बाबासाहेब इंगळे, अ‍ॅड. अशोक मते, अ‍ॅड. गजानन जक्कलवार, अ‍ॅड. सचिन खटकळ, अ‍ॅड. राहुल चव्हाण, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी, घनश्याम साळुंके, अ‍ॅड. वसंत पवार, अ‍ॅड. संदीप हराळ, राम गव्हाणे, अ‍ॅड. भीमाशंकर देशमाने, अ‍ॅड. सुजित मोटे, बालासाहेब भुतेकर आदींची उपस्थिती होती.या दौडच्या वेळी सिंदखेडराजा, किनगाव राजा, मेहकर, मालेगाव जहांगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा आणि सेवाग्राम असा मार्ग राहणार आहे.ढवळे हे दररोज सरारी ५० किलोमीटरचे अंतर धावणार आहेत. राजेभाऊ यांचे सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक