शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

गांधी संदेश दौड; राजेभाऊ ढवळे सेवाग्रामकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 01:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम ...

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जालन्यातील अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी जालना ते सेवाग्राम अशी धावण्याची गांधी संदेश दौड प्रारंभीली आहे. बुधवारी सकाळी ६ वा. माजी आ. कैलास गोरंट्याल यांनी हिरवा झेंडा दाखवून ढवळे यांच्या दौडला प्रारंभ झाला.जुना जालना भागातील गांधी चमन येथे प्रारंभी महात्मा गांधीच्या पुतळ्यास अ‍ॅड. राजेभाऊ ढवळे यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी जालना ते सेवाग्राम ३०० किलोमीटरचे अंतर ढवळे हे महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पूर्ण करुन सेवाग्राम येथे या दौडची सांगता करणार आहेत.बुधवारी सकाळी त्यांना निरोप देण्यासाठी त्यांच्य मित्रपरिवारासह अन्य मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यात महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख प्रा. यशवंत सोनुने, वकील संघाचे अध्यक्ष लक्ष्मण उढाण, उपाध्यक्ष दिनेश भोजने, जिल्हा सरकारी वकील विपुल देशपांडे, अ‍ॅड. जगदीश बडवे, अ‍ॅड. प्रदीप जाधव, अ‍ॅड. सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. किशोर राऊत, अ‍ॅड. सतीश तवरावाला, अ‍ॅड. बाबासाहेब इंगळे, अ‍ॅड. अशोक मते, अ‍ॅड. गजानन जक्कलवार, अ‍ॅड. सचिन खटकळ, अ‍ॅड. राहुल चव्हाण, अ‍ॅड. डी. के. कुलकर्णी, घनश्याम साळुंके, अ‍ॅड. वसंत पवार, अ‍ॅड. संदीप हराळ, राम गव्हाणे, अ‍ॅड. भीमाशंकर देशमाने, अ‍ॅड. सुजित मोटे, बालासाहेब भुतेकर आदींची उपस्थिती होती.या दौडच्या वेळी सिंदखेडराजा, किनगाव राजा, मेहकर, मालेगाव जहांगीर, कारंजा लाड, पुलगाव, वर्धा आणि सेवाग्राम असा मार्ग राहणार आहे.ढवळे हे दररोज सरारी ५० किलोमीटरचे अंतर धावणार आहेत. राजेभाऊ यांचे सकाळी वेगवेगळ्या ठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीSocialसामाजिक