शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

गांधीजी यांचे विचार मानवी कल्याणाचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 01:09 IST

जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या वर्तमानात गांधी समजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातीलमहात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ‘१५० नंतर गांधी’ या विषयावर १६ वे राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे सचिव श्रीनिवास भक्कड बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, राष्ट्रीय युवा संगठनचे मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागतपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काबरा म्हणाले, अशा शिबिरांची आज तरुणाईला खरी गरज आहे. म्हणून अशा शिबिरात शिबिरार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय युवा संगठनचे माजी संयोजक मनोज ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, अशा राज्यस्तरीय शिबिरातून अनेक तरुणांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. हे शिबीर म्हणजे आपले प्रतिबिंब दाखविणारा आरसा असतो. यातूनच आपले व्यक्तित्व घडत असते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन महावीर सदावर्ते यांनी तर आभार डॉ. व्ही. बी. उगले यांनी मानले. याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, वकील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दुपारी झालेल्या परिसंवादात प्रा. प्रशांत नागोसे यांनी शिबीर आणि जीवन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुरूवारी जलवायू परिवर्तन या विषयावर सोपान जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcollegeमहाविद्यालयSocialसामाजिक