शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

गांधीजी यांचे विचार मानवी कल्याणाचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 01:09 IST

जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आजच्या वर्तमानात गांधी समजून घेतल्याशिवाय पर्यायच नाही. जीवनातील प्रत्येक परिवर्तन हे गांधी विचारांवर केंद्रीभूत झाल्यास ते निश्चित मानवी कल्याणाचे असेल, असे प्रतिपादन श्रीनिवास भक्कड यांनी केले.येथील जेईएस महाविद्यालयातीलमहात्मा गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ‘१५० नंतर गांधी’ या विषयावर १६ वे राज्यस्तरीय गांधीविचार अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबीर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून संस्थेचे सचिव श्रीनिवास भक्कड बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, राष्ट्रीय युवा संगठनचे मनोज ठाकरे, प्रशांत नागोसे, केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागतपर मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. काबरा म्हणाले, अशा शिबिरांची आज तरुणाईला खरी गरज आहे. म्हणून अशा शिबिरात शिबिरार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राष्ट्रीय युवा संगठनचे माजी संयोजक मनोज ठाकरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, अशा राज्यस्तरीय शिबिरातून अनेक तरुणांना जगण्याची नवी दिशा मिळाली आहे. हे शिबीर म्हणजे आपले प्रतिबिंब दाखविणारा आरसा असतो. यातूनच आपले व्यक्तित्व घडत असते, असेही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. यशवंत सोनुने यांनी केले. सूत्रसंचालन महावीर सदावर्ते यांनी तर आभार डॉ. व्ही. बी. उगले यांनी मानले. याप्रसंगी शहरातील ज्येष्ठ नागरिक, प्राध्यापक, वकील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच शिबिरार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, दुपारी झालेल्या परिसंवादात प्रा. प्रशांत नागोसे यांनी शिबीर आणि जीवन या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. गुरूवारी जलवायू परिवर्तन या विषयावर सोपान जोशी हे मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीcollegeमहाविद्यालयSocialसामाजिक