शहरं
Join us  
Trending Stories
1
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
2
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
4
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
5
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
6
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
7
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
8
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
9
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
10
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
11
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
12
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
13
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
14
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
15
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
16
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
17
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
18
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
19
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
20
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...

देशाचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:34 IST

योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशाचे भवितव्य शेतकºयांच्या हाती आहे. खरा भारत दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर छोट्या खेड्यांमध्ये वसतो. योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी गुरुवारी परतूर तालुक्यातील वाटूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.वाटूर येथे आर्ट आॅफ लिव्हींगच्या आतंरराष्ट्रीय केंद्राचे लोकार्पण श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी मेळावा, महासत्संग, प्रोजेक्ट भारत प्रतिनिधी सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की, रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज आहे. शेतक-यांच्या अनेक समस्यांचे समाधान रसायनमुक्त शेतीमध्ये असून, झिरो बजेट रसायनमुक्त शेती करणा-या शेतक-यांना बाजारपेठ मिळेल की नाही अशी काहींना शंका वाटते. रसायनमुक्त शेती करणा-या कोणत्याही शेतक-याने चिंता करू नये. अशा शेतक-यांचा सर्व शेतीमाल आम्ही आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून खरेदी करू. गाव मजबूत व बळकट करण्यामध्ये जातीयवाद व गटातटाचे विविध वाद अडचण आणतात. महाराष्ट्राला मोठी समृद्ध संत परंपरा लाभली असून, या संत परंपरेने निर्माण केलेली भक्तीलाट पुन्हा एकदा वाहण्याची गरज असून, ही भक्ती लाटच सर्व जातीयवाद, विविध गटांच्या वादावरील रामबाण इलाज आहे. भक्तीची शक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले आत्मबल येण्यासाठी योग, प्राणायाम व ध्यान यांची उपासना अत्यावश्यक असल्याचेही शेवटी ते म्हणाले.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगFarmerशेतकरी