शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

देशाचे भवितव्य शेतकऱ्यांच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 00:34 IST

योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाटूर : भारत हा कृषिप्रधान देश असून, देशाचे भवितव्य शेतकºयांच्या हाती आहे. खरा भारत दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये नव्हे तर छोट्या खेड्यांमध्ये वसतो. योग आणि उद्योगाच्या माध्यमातून समृद्ध व निरोगी गाव निर्माण करून मजबूत भारत निर्माण करण्यासाठी कार्य केले पाहिजे, असे प्रतिपादन आर्ट आॅफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी गुरुवारी परतूर तालुक्यातील वाटूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.वाटूर येथे आर्ट आॅफ लिव्हींगच्या आतंरराष्ट्रीय केंद्राचे लोकार्पण श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकरी मेळावा, महासत्संग, प्रोजेक्ट भारत प्रतिनिधी सभेमध्ये बोलताना ते म्हणाले की, रसायनमुक्त शेती ही आजच्या काळाची गरज आहे. शेतक-यांच्या अनेक समस्यांचे समाधान रसायनमुक्त शेतीमध्ये असून, झिरो बजेट रसायनमुक्त शेती करणा-या शेतक-यांना बाजारपेठ मिळेल की नाही अशी काहींना शंका वाटते. रसायनमुक्त शेती करणा-या कोणत्याही शेतक-याने चिंता करू नये. अशा शेतक-यांचा सर्व शेतीमाल आम्ही आर्ट आॅफ लिव्हींगच्या माध्यमातून खरेदी करू. गाव मजबूत व बळकट करण्यामध्ये जातीयवाद व गटातटाचे विविध वाद अडचण आणतात. महाराष्ट्राला मोठी समृद्ध संत परंपरा लाभली असून, या संत परंपरेने निर्माण केलेली भक्तीलाट पुन्हा एकदा वाहण्याची गरज असून, ही भक्ती लाटच सर्व जातीयवाद, विविध गटांच्या वादावरील रामबाण इलाज आहे. भक्तीची शक्ती निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेले आत्मबल येण्यासाठी योग, प्राणायाम व ध्यान यांची उपासना अत्यावश्यक असल्याचेही शेवटी ते म्हणाले.

टॅग्स :spiritualअध्यात्मिकArt of Livingआर्ट आॅफ लिव्हिंगFarmerशेतकरी