शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

राम मंदिर उभारणीसाठी १३ कोटींच्या निधीचे संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:34 IST

रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयमंगल जाधव यांनी सांगितले की, संपूर्ण देशभर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधीचे संकलन केले ...

रविवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत जयमंगल जाधव यांनी सांगितले की, संपूर्ण देशभर अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी निधीचे संकलन केले जात होते. त्याचाच एक भाग म्हणून जालन्यातही समर्पण निधी संकलन समितीची स्थापना करण्यात आली होती. याचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक घनश्याम गोयल हे होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास सर्व गावांमध्ये रामभक्तांनी प्रत्यक्ष भेटी देऊन मंदिर उभारणीसाठी देणगी स्वीकारली आहे.

यात हिंदू धर्मातील सर्व जातींचे नागरिक आणि रामभक्त सहभागी झाल्याचे जयमंगल जाधव म्हणाले. अयोध्येत होऊ घातलेले भव्य राम मंदिर उभारणीसाठी एक हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे मंदिर उभारताना प्रत्येक रामभक्ताचा त्यात अर्थपूर्ण खारीचा वाटा असावा, या हेतूने ही समर्पण देणगी स्वीकारण्याची मोहीम हाती घेतली होती. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जालन्यातील दानशूर व्यापारी, उद्योजकांसह सामान्यातील सामान्य रामभक्तानेदेखील आपल्या ऐपतीप्रमाणे ही देणगी मनाेभावे दिल्याचे सांगण्यात आले. राम मंदिर उभारणीसाठी पथनाट्यांच्या माध्यमातूनही जागृती करण्यात आली.

या निधी संकलनासाठी येथील सर्व रामभक्त तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गोयल, श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष घनश्याम गाेयल, उपाध्यक्ष जयमंगल जाधव, नितीन अग्रवाल, मनोहर खाकरे, प्रशांत नवगिरे, बालाजी वाघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह राजेंद्र कळकटे आदींनी परिश्रम घेतले.