शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

चार ‘शिवशाही’तूून २३ लाखांचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 01:04 IST

जालना आगारात महिनाभरापूर्वी नव्याने चार शिवशाही (सिटर) बस दाखल झाल्या होत्या. महिनाभरात तब्बल २३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

विकास व्होरकटे ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना आगारात महिनाभरापूर्वी नव्याने चार शिवशाही (सिटर) बस दाखल झाल्या होत्या. या चारही बस नफ्यात आहेत. महिनाभरात या शिवशाही बसला तब्बल २३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्याच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एस. टी. महामंडळातर्फे, नेहमी बसेसमध्ये बदल केले जातात. पूर्वी महामंडळाद्वारे भाडेतत्त्वावर खाजगी कंपन्याच्या वातानुकूलित बसेस जालना विभागात सुरू करण्यात आल्या होत्या. मध्यंतरी महामंडळ व खाजगी कंपनीच्या काही बसचा करार संपला आहे. त्यामुळे विभागातील अनेक भाडेतत्त्वावरील शिवाशाही बंद झाल्या आहेत. त्यामुळे महामंडळाने स्वमालकीच्या शिवशाही सुरू केल्या आहेत.डिसेंबर महिन्याच्या प्रारंभी जालना आगारात चार शिवशाही दाखल झाल्या होत्या. यातील तीन बस पुणे मार्गावर सोडण्यात आल्या असून, एक बस नाशिक या मार्गावर आहे. बसचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे या चारही बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.महिनाभरात चार शिवशाही बसने ६२ हजार ६३४ किलोमीटर अंतर पार केले आहे. यातून महामंडळाला २३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.एसटी महामंडळाने आता खाजगी ट्रॅव्हल्सला टक्कर देण्यासाठी विविध आधुनिक बसेस उपलब्ध करून घेतल्या आहेत. त्यामुळे अनेक प्रवासी आता पुणे, मुंबईसह अन्य दूरच्या प्रवासासाठी एसटी महामंडळानेच प्रवास करणे पसंत करत असल्याचे दिसून येते.दोन बस भाडेतत्त्वावरजालना आगारात सद्यस्थितीत दोन शिवशाही स्लीपर बसभाडे तत्त्वावर चालविण्यात येत आहे. संबंधित बसला महामंडळातर्फे, चार किलोमीटरला एक लिटर डिझेल दिले जात असून, १५.७५ रूपये प्रति किलोमीटरने पैसे दिले जात आहे.बसवर संबंधित कंपनीचा चालक असून, वाहन महामंडळाचा आहे. या दोन्ही बस कोल्हापूर मार्गावर महामंडळाकडून चालविल्या जात आहेत. मागील महिन्यात या बसचे अंतर ३१ हजार किलोमीटर झाले आहे. यातून महामंडळाला १३ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी