शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

चार कारखान्यांचा बॉयलर पेटला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील तीन सहकारी आणि दोन खाजगी कारखान्यांपैकी रामेश्वर सहकारी कारखाना वगळता अन्य चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. समर्थ आणि सागर या कारखान्यांचा गळीत हंगामास गुरूवारपासून प्रारंभ होत असल्याचे विभागीय साखर सहसंचालकांनी सांगितले.जालना जिल्ह्यात सर्वात जुना सहकारी कारखाना म्हणून सहकार महर्षी स्व. अंकुशराव टोपे यांनी अंकुशनगर येथे सुरू केला होता. नंतर त्यांनी तीर्थपुरी येथे सागर कारखाना सुरू केला होता. या दोन्ही कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र हे, १६ हजार ५०० हेक्टर एवढे असून, जवळपास ३ हजार हेक्टरवरील ऊस अन्य जिल्ह्यांतून आणावा लागणार आहे. यावेळी समर्थ आणि सागर कारखान्याचे यंदाचे साखर गाळपाचे उद्दिष्ट हे पाच लाख मेट्रिक टन ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ९०० बैलगाड्या, २५० उसतोड कामगारांच्या टोळ्या कार्यरत असून, ३०० पेक्षा अधिक छोटे ट्रॅक्टर उसाची वाहतूक करण्यासाठी लावले असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते या दोन्ही कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे. यापूर्वीच जालना जिल्ह्यातील परतूर येथील बागेश्वरी सहकारी साखर कारखाना आणि कुंभारपिंपळगाव येथील समृध्दी हे दोन खासगी तत्वावरील साखर कारखान्यांनी यापूर्वीच त्यांचा गळीत हंगाम प्रारंभ केला आहे. केवळ भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी अत्यंत प्रतिकूल स्थितीत १७ गळीत हंगाम पूर्ण केले. गेल्यावर्षी दुष्काळामुळे या भागातील उसाची लागवड अत्यल्प होती, तसेच जो ऊस शिल्लक आहे, तो वाळून गेला असून, काही ऊसाचा उपयोग हा गुरांच्या चाऱ्यासाठी केल्याने उसच शिल्लक नसल्याने यंदा आम्ही गळीत हंगाम सुरू करणार नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाने साखर आयुक्तांना कळविले आहे.दरम्यान रामेश्वर सहकारी साखर कारखाना यंदा चालू होणार नसला तरी या हंगामात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी या परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढून ऊस उपलब्ध होईल, अशी आशा कारखाना व्यवस्थापनाला आहे.सौर उर्जेला प्राधान्य : साखर उद्योगासोबतच पूरक उद्योगआज केवळ साखरेचे उत्पादन घेणे हे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे या कारखान्यांनी उसापासून निघणारी मळी तसेच आता इथेनॉलचे प्रकल्प सुरू केले आहेत. या सोबतच सौर उर्जेला प्राधान्य देत यातील काही कारखान्यांनी को-जनरेशन प्लांटही उभारले आहेत. यामुळे कारखान्याला लागणारी विजेची गरज पूर्ण होऊन हे कारखाने वीज वितरण कंपनीला आपली उत्पादित वीज विक्री करून त्यातूनही अर्थाजन करतात.त्यामुळे ग्रामीण भागासाठी हा उद्योग महत्वाची भूमिका निभावत असल्याचे सांगण्यात आले. ऊसतोड कामगारांसाठी साखर कारखाने हा महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही कारखाना क्षेत्रा व्यतिरिक्त केवळ ऊसतोड कामगारांना या हंगामातच मोठी मागणी असते.उसावरील बंदीचा प्रस्ताव मागे घेण्याची गरजऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धतता आवश्यक असते. त्यामुळे उसाला पूर्णपणे ठिबक पद्धतीने पाणी देण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. त्यातच मध्यंतरी विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यात उसाचे पीक घेण्यास मज्जाव करावा काय, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु हा प्रस्ताव सहकारी साखर कारखान्यांसाठी घातक असून, हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी