शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चार कारखान्यांचा बॉयलर पेटला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 00:23 IST

जिल्ह्यातील चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील तीन सहकारी आणि दोन खाजगी कारखान्यांपैकी रामेश्वर सहकारी कारखाना वगळता अन्य चार कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. समर्थ आणि सागर या कारखान्यांचा गळीत हंगामास गुरूवारपासून प्रारंभ होत असल्याचे विभागीय साखर सहसंचालकांनी सांगितले.जालना जिल्ह्यात सर्वात जुना सहकारी कारखाना म्हणून सहकार महर्षी स्व. अंकुशराव टोपे यांनी अंकुशनगर येथे सुरू केला होता. नंतर त्यांनी तीर्थपुरी येथे सागर कारखाना सुरू केला होता. या दोन्ही कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र हे, १६ हजार ५०० हेक्टर एवढे असून, जवळपास ३ हजार हेक्टरवरील ऊस अन्य जिल्ह्यांतून आणावा लागणार आहे. यावेळी समर्थ आणि सागर कारखान्याचे यंदाचे साखर गाळपाचे उद्दिष्ट हे पाच लाख मेट्रिक टन ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ९०० बैलगाड्या, २५० उसतोड कामगारांच्या टोळ्या कार्यरत असून, ३०० पेक्षा अधिक छोटे ट्रॅक्टर उसाची वाहतूक करण्यासाठी लावले असल्याचे सांगण्यात आले.जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते या दोन्ही कारखान्यांच्या गाळप हंगामाचा शुभारंभ होणार आहे. यापूर्वीच जालना जिल्ह्यातील परतूर येथील बागेश्वरी सहकारी साखर कारखाना आणि कुंभारपिंपळगाव येथील समृध्दी हे दोन खासगी तत्वावरील साखर कारखान्यांनी यापूर्वीच त्यांचा गळीत हंगाम प्रारंभ केला आहे. केवळ भोकरदन तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याने यापूर्वी अत्यंत प्रतिकूल स्थितीत १७ गळीत हंगाम पूर्ण केले. गेल्यावर्षी दुष्काळामुळे या भागातील उसाची लागवड अत्यल्प होती, तसेच जो ऊस शिल्लक आहे, तो वाळून गेला असून, काही ऊसाचा उपयोग हा गुरांच्या चाऱ्यासाठी केल्याने उसच शिल्लक नसल्याने यंदा आम्ही गळीत हंगाम सुरू करणार नसल्याचे कारखाना व्यवस्थापनाने साखर आयुक्तांना कळविले आहे.दरम्यान रामेश्वर सहकारी साखर कारखाना यंदा चालू होणार नसला तरी या हंगामात भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे पुढील वर्षी या परिसरात ऊसाचे क्षेत्र वाढून ऊस उपलब्ध होईल, अशी आशा कारखाना व्यवस्थापनाला आहे.सौर उर्जेला प्राधान्य : साखर उद्योगासोबतच पूरक उद्योगआज केवळ साखरेचे उत्पादन घेणे हे आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. त्यामुळे या कारखान्यांनी उसापासून निघणारी मळी तसेच आता इथेनॉलचे प्रकल्प सुरू केले आहेत. या सोबतच सौर उर्जेला प्राधान्य देत यातील काही कारखान्यांनी को-जनरेशन प्लांटही उभारले आहेत. यामुळे कारखान्याला लागणारी विजेची गरज पूर्ण होऊन हे कारखाने वीज वितरण कंपनीला आपली उत्पादित वीज विक्री करून त्यातूनही अर्थाजन करतात.त्यामुळे ग्रामीण भागासाठी हा उद्योग महत्वाची भूमिका निभावत असल्याचे सांगण्यात आले. ऊसतोड कामगारांसाठी साखर कारखाने हा महत्त्वाचा घटक आहे. कुठल्याही कारखाना क्षेत्रा व्यतिरिक्त केवळ ऊसतोड कामगारांना या हंगामातच मोठी मागणी असते.उसावरील बंदीचा प्रस्ताव मागे घेण्याची गरजऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची उपलब्धतता आवश्यक असते. त्यामुळे उसाला पूर्णपणे ठिबक पद्धतीने पाणी देण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. त्यातच मध्यंतरी विभागीय आयुक्तांनी मराठवाड्यात उसाचे पीक घेण्यास मज्जाव करावा काय, या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु हा प्रस्ताव सहकारी साखर कारखान्यांसाठी घातक असून, हा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी