शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

कचरा निर्मूलनासाठी चार कोटींचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 00:16 IST

जालना शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सामनगाव येथे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून आता रेवगाव रोडवर यापूर्वी पालिकेचे डपिंग ग्राऊड होते.

ठळक मुद्देसंगीता गोरंट्याल : रेवगाव मार्गावरील कचऱ्याचे डोंगर होणार भुईसपाट, कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार लाभ

जालना : जालना शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. सामनगाव येथे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू असून, याचाच एक भाग म्हणून आता रेवगाव रोडवर यापूर्वी पालिकेचे डपिंग ग्राऊड होते. तेथे आज घडीला मोठ-मोठे कच-याचे ढीग आहेत. त्याची शास्त्रशुध्द पध्दतीने विल्हेवाट लावून त्या कचºयापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने सव्वाचार कोटी रूपयांची तरतूद केल्याची माहिती नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी दिली.गुरूवारी या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देताना नगराध्यक्षा गोरंट्याल म्हणाल्या की, जालना शहरातील कचरा उचलण्यासाठी यापूर्वी जवळपास ४० पेक्षा अधिक घंटागाड्या तैनात केल्या आहेत, त्याचे चांगले परिणाम दिसून येत असून, चौकांमध्ये दिसणारे कचºयाचे ढीग हे आता स्वच्छ झाले आहेत. नागरिकांच्या घरोघरी जाऊन या घंटागाड्या कचºयाचे संकलन करतात.आता घनकचरा प्रकल्पाचा भाग असलेल्या ही कचरा निर्मूलन मोहीम असून, यासाठी जालना पालिकेने निविदा मागवली होती. पुणे येथील एका पर्यावरण संदर्भात काम करणाºया कंपनीने सर्वात कमी दराची निविदा भरल्याने त्यांची निविदा स्किारण्यात आली असल्याचे गोरंट्याल म्हणाल्या. ही निविदा अन्य निविदांच्या तुलनेत १४ टक्यांनी कमी होती त्यामुळे पालिकेचे जवळपास सव्वातीन लाख रूपयांची बचत झाली असल्याचा दावा त्यांनी केला. यावेळी शेख महेमूद, विजय चौधरी, गणेश राऊत, मेघराज चौधरी यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.कचºयावर प्रक्रिया : उपस्थितांना थेट प्रात्यक्षिक दाखवलेपत्रकार परिषद संपल्यावर नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सर्व पत्रकारांना रेवगाव येथील डपिंग ग्राऊंड नेऊन नव्याने आणलेल्या मशीनचे प्रात्याक्षिक दाखवले. यातून कचºयातील वेगवेगळे टाकाऊ पदार्थ वेगळे करून त्यापासून खत निर्मिती कशी होते. हे दर्शवण्यात आले.एकूणच येत्या तीन महिन्यात रेवगाव येथील हे कचºयाचे डोंगर भूईसपाट होतील असेही त्यांनी सांगितले. घनकचरा प्रकल्पाचे काम आता गतीने मार्गी लागेल, अशी आशा निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षापासून हा प्रकल्प या ना त्या कारणाने लांबणीवर पडला होता.

टॅग्स :JalanaजालनाJalana Muncipalityजालना नगरपरिषदGarbage Disposal Issueकचरा प्रश्न