शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

वीजतोडणी मोहीम थांबविण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

जालना : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरणकडून कृषी पंपांची वीजतोडणी केली जात आहे. ही बाब माजी मंत्री अर्जुन खोतकर ...

जालना : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरणकडून कृषी पंपांची वीजतोडणी केली जात आहे. ही बाब माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विशद केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याचे खोतकर यांनी सांगितले.

कोरोनामुळे गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीत सर्व व्यवहार ठप्प होते. त्यात अतिवृष्टी, रोगराईमुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता वीज कंपनीने थकीत वीज बिलामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही बाब लक्षात घेऊन खोतकर यांनी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी योग्य तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले होते.

महावितरणने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थकीत वीज बिले भरणा न करणाऱ्या ग्राहकांची वीज तोडणी सुरू केली आहे. सध्या गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. त्यांना पाणी देणे सुरू आहे. अशा परिस्थितीत वीज तोडल्यास शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. त्यामुळे वीज कंपनीने तत्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी,अशी मागणीही खोतकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता आपण स्वत: यात लक्ष देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती खोतकर यांनी दिली.