शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

वीजतोडणी मोहीम थांबविण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:28 IST

जालना : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरणकडून कृषी पंपांची वीजतोडणी केली जात आहे. ही बाब माजी मंत्री अर्जुन खोतकर ...

जालना : थकीत वीज बिलाच्या पोटी महावितरणकडून कृषी पंपांची वीजतोडणी केली जात आहे. ही बाब माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिली असून, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी विशद केल्या आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या प्रकरणात सकारात्मक भूमिका घेतल्याचे खोतकर यांनी सांगितले.

कोरोनामुळे गतवर्षी उद्भवलेल्या परिस्थितीत सर्व व्यवहार ठप्प होते. त्यात अतिवृष्टी, रोगराईमुळे शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता वीज कंपनीने थकीत वीज बिलामुळे कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ही बाब लक्षात घेऊन खोतकर यांनी मुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी योग्य तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले होते.

महावितरणने फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच थकीत वीज बिले भरणा न करणाऱ्या ग्राहकांची वीज तोडणी सुरू केली आहे. सध्या गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बी हंगामातील पिके जोमात आहेत. त्यांना पाणी देणे सुरू आहे. अशा परिस्थितीत वीज तोडल्यास शेतकऱ्यांच्या हाता- तोंडाशी आलेला घास हिरावला जाणार आहे. त्यामुळे वीज कंपनीने तत्काळ वीज तोडणी मोहीम थांबवावी,अशी मागणीही खोतकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या अडचणी पाहता आपण स्वत: यात लक्ष देणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितल्याची माहिती खोतकर यांनी दिली.