शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:41 IST

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी दुष्काळाने आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पावसावर लावलेले खरीप पिकांचे उत्पादन यंदा आधीच कमी होणार आहे. असे असतांनाच जे उत्पादन होऊन थोडाफार पैसा शेतकऱ्यांच्या हातात आला असता, परंतु आता या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले. गोरंट्याल यांनी रविवारी सकाळपासूनच जालना विधानसभा मतदारसंघातील विविध गावे, वाड्यांना भेटी देऊन थेट शेतात जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक शेतकºयांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला असून, आता हेक्टरी सरासरी २५ हजार रूपयांची मदत मिळाल्यास थोडे बहुत नुकसान भरून निघेल असे सांगितले. यावेळी गोरंट्याल यांनी देखील शेतक-यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तुमच्या वेदना मी समजू शकतो, असे सांगितले. शेतक-यांनी घाबरून न जात ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यावेळी आपण आपल्या मागण्या प्रखरपणाने मांडू अशी ग्वाही गोरंट्याल यांनी दिली.यावेळी राम सावंत, माऊली इंगोले, अ‍ॅड. सोपान शेजूळ, कृष्णा पडूळ, दिलीप मोरे, जालिंधर डोईफोडे, शिवाजी गायकवाड, मारूती पठारे, देवीदास क्षिरसागर, सुभाष राठोड, अरूण ्नचव्हाण यांच्यासह जालन्याचे तहसीलदार भुजबळ, गटविकास अधिकारी तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. गोरंट्याल यांनी रविवारी मौजपुरी, कडवंची, इंदेवाडी, जामवाडी आदी गावांना भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधला.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीMLAआमदार