शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:41 IST

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी दुष्काळाने आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पावसावर लावलेले खरीप पिकांचे उत्पादन यंदा आधीच कमी होणार आहे. असे असतांनाच जे उत्पादन होऊन थोडाफार पैसा शेतकऱ्यांच्या हातात आला असता, परंतु आता या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले. गोरंट्याल यांनी रविवारी सकाळपासूनच जालना विधानसभा मतदारसंघातील विविध गावे, वाड्यांना भेटी देऊन थेट शेतात जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक शेतकºयांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला असून, आता हेक्टरी सरासरी २५ हजार रूपयांची मदत मिळाल्यास थोडे बहुत नुकसान भरून निघेल असे सांगितले. यावेळी गोरंट्याल यांनी देखील शेतक-यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तुमच्या वेदना मी समजू शकतो, असे सांगितले. शेतक-यांनी घाबरून न जात ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यावेळी आपण आपल्या मागण्या प्रखरपणाने मांडू अशी ग्वाही गोरंट्याल यांनी दिली.यावेळी राम सावंत, माऊली इंगोले, अ‍ॅड. सोपान शेजूळ, कृष्णा पडूळ, दिलीप मोरे, जालिंधर डोईफोडे, शिवाजी गायकवाड, मारूती पठारे, देवीदास क्षिरसागर, सुभाष राठोड, अरूण ्नचव्हाण यांच्यासह जालन्याचे तहसीलदार भुजबळ, गटविकास अधिकारी तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. गोरंट्याल यांनी रविवारी मौजपुरी, कडवंची, इंदेवाडी, जामवाडी आदी गावांना भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधला.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीMLAआमदार