शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविम्याच्या निकषात बदल करण्यासाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 00:41 IST

द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : आधी दुष्काळाने आणि आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पावसावर लावलेले खरीप पिकांचे उत्पादन यंदा आधीच कमी होणार आहे. असे असतांनाच जे उत्पादन होऊन थोडाफार पैसा शेतकऱ्यांच्या हातात आला असता, परंतु आता या आशेवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे. द्राक्ष बागांसाठी फळ पीकविमा देताना निकष बदलण्यासाठी आपण सरकार दरबारी विशेष प्रयत्न करू असे आश्वासन आ. कैलास गोरंट्याल यांनी शेतक-यांना दिले. गोरंट्याल यांनी रविवारी सकाळपासूनच जालना विधानसभा मतदारसंघातील विविध गावे, वाड्यांना भेटी देऊन थेट शेतात जाऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. यावेळी अनेक शेतकºयांनी त्यांना आपल्या व्यथा सांगितल्या. हातातोडांशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला असून, आता हेक्टरी सरासरी २५ हजार रूपयांची मदत मिळाल्यास थोडे बहुत नुकसान भरून निघेल असे सांगितले. यावेळी गोरंट्याल यांनी देखील शेतक-यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून तुमच्या वेदना मी समजू शकतो, असे सांगितले. शेतक-यांनी घाबरून न जात ज्यावेळी सरकार स्थापन होईल त्यावेळी आपण आपल्या मागण्या प्रखरपणाने मांडू अशी ग्वाही गोरंट्याल यांनी दिली.यावेळी राम सावंत, माऊली इंगोले, अ‍ॅड. सोपान शेजूळ, कृष्णा पडूळ, दिलीप मोरे, जालिंधर डोईफोडे, शिवाजी गायकवाड, मारूती पठारे, देवीदास क्षिरसागर, सुभाष राठोड, अरूण ्नचव्हाण यांच्यासह जालन्याचे तहसीलदार भुजबळ, गटविकास अधिकारी तसेच मंडळ अधिकारी आणि तलाठी उपस्थित होते. गोरंट्याल यांनी रविवारी मौजपुरी, कडवंची, इंदेवाडी, जामवाडी आदी गावांना भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधला.

टॅग्स :RainपाऊसagricultureशेतीMLAआमदार