शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

औताडे यांचा प्रत्यक्ष भेटींवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 00:49 IST

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांनी त्यांच्या प्रचाराचा एक भाग म्हणून बुधवारी सकाळी जालन्यातील गुरू गणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून त्यांनी येथे भेट दिली.प्रारंभी त्यांनी गुरूगणेश महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन जैन साध्वींचे आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांचे स्वागत श्रावक संघाचे अध्यक्ष गौतम रूणवाल, उपाध्यक्ष नरेंद्र लुणिया, सचिव विजय सुराणा, सहसचिव कचरूलाल कुंकूलोळ, डॉ. धरमचंद गादिया, सुदेश सकलेचा, संजय मुथा, स्वरूपचंद ललवाणी, भरत गादिया आदींची उपस्थिती होती.यावेळी औताडे यांनी शहरातील विविध व्यापारी, उद्योजकांच्या भेटी घेतल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या समवेत विजय कामड आणि अन्य काँग्रेसचे पदाधिकारी हजर होते. औताडे यांनी सकाळनंतर अंबड शहरासह तालुक्यातील गावांना भेटी देऊन बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवून लोकांची दिशाभूल केल्याचे सांगितले. त्यांच्या समवेत झिरपी, रोहिलागड येथेही त्यांनी भेटी दिल्या.गोरंट्याल यांची फेरीजालना तालुक्यातील वाघ्रूळ, रामनगर, बाजीउम्रद, सोमनाथ जळगाव, मानेगाव तसेच अन्य गावांना गोरंट्याल यांनी भेटी दिल्या. तसेच तेथील ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांना औताडे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी त्यांच्या समवेत शेख महेमूद, विजय चौधरी, गणेश चौधरी, विनोद यादव यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची उपस्थिती होती. औताडे यांच्या प्रचारासाठी जनमानसातून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती गोरंट्याल यांनी दिली. दरम्यान गेल्या चार टर्मपासून दानवे हेच निवडून येत असले तरी, गेली पाच वर्षे वगळता दानवेंनी पाहिजे तसा विकास केला नसल्याचे ते म्हणाले. गुरूवारी जालन्यातून पदयात्रा काढणार असल्याचे गोरंट्याल म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालनाcongressकाँग्रेस