शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

विद्युत तारा तुटून पाच दुकाने खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:10 IST

वीज वितरण कंपनीची एल टी लाईनची तार तुटून बसस्थानकासमोरील पाच दुकानाला आग लागून ११ लाख रुपयांचे नुकसान झाले

लोकमत न्यूज नेटवर्कतीर्थपुरी : येथील वीज वितरण कंपनीची एल टी लाईनची तार तुटून बसस्थानकासमोरील पाच दुकानाला आग लागून ११ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेआठ वाजता घडली आहे. मात्र, वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता म्हणाले की, घटना घडली तेव्हा वीज पुरवठा बंद होता. यामुळे शॉर्टसर्किट व्हायचा प्रश्नच येत नाही.येथील कुंभार पिंपळगाव रस्त्यावरील बसस्थानकासमोर शेख इस्माईल पिंजारी यांचे गादी घर आहे. बुधवारी सकाळी एल टी वीजेची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने त्यांच्या दुकानाला आग लागली. यात दुकानातील रूईच्या दोन मशीन, २० हजार रुपये किमतीचा कपडा २० हजार रूपयाचे पत्र्याचे शेड असा एकूण पाच लाख रूपयांचे नुकसान झाले. यानंतर या दुकानाच्या बाजूलाच असणाऱ्या शेख सत्तार यांचे राज मोटर रिवाइडिंग दुकान जळाले. त्यामध्ये मोटर पंप वेल्डिंग मशीन व इतर साहित्य असे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.संतोष पवार यांच्या किसान मोटार रिवायडींगलाही आग लागली. यात सहा मोटार पंप एसटीपी पंप, फॅन मीटर, ठिबक सिंचनाचे साहित्य असा दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. तसेच शेख बशीर यांचे लाकडी फर्निचर चे दुकानही जळाले त्यात दीड लाखाचे नुकसान झाले.तीर्थपुरी येथील नवीन बस बसस्थानकासमोपरील या दुकानाला आग लागली त्यावेळी वीज वितरण कंपनीचा वीजपुरवठा बंद होता. गावातील काही विजेचे काम सुरू असल्यामुळे वीज बंद होती. यामुळे शॉर्टसर्किट झालेले नाही. उलट दुकानाला आग लागल्यामुळे आगीचा भडका झाल्याने विजेच्या तारा वितळून तुटल्या आहेत. तसेच ज्या दुकानाला आग लागली त्यांच्याकडे थकबाकी असल्यामुळे त्यांचा वीजपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात आला होता. अशी माहिती वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश परशे यांनी दिली आहे. तर प्रत्यक्षदर्शी म्हणतात विजेच्या शॉर्ट सर्किटनेच ही आग लागली आहे.

टॅग्स :fireआगMarketबाजार