शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

पाझर तलावात बुडून पाच मुलींचा मृत्यू; आंघोळीला गेल्या, पण खड्ड्याने घात केला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:24 IST

मृत्युमुखी पडलेल्या पाचही मुली आपसात नातेवाईक असून ८ ते १२ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

भोकरदन : तालुक्यातील तळेगाववाडी येथील पाझर तलावात आंघोळीसाठी गेलेल्या पाच मुलींचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. मृत्युमुखी पडलेल्या पाचही मुली आपसात नातेवाईक असून ८ ते १२ वयोगटातील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

तळेगाववाडी येथील पाझर तलावाच्याजवळ काही नागरिकांची वस्ती आहे. आज दुपारी येथील सहा मुली पाझर तलावात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुतल्यानंतर सहाही मुली वस्तीवर येऊन अंघोळीसाठी परत तलावावर गेल्या. पाण्यात उतरल्यानंतर त्यातील एक मुलगी तलावातील खड्ड्यात बुडाली. तिला वाचविण्यासाठी दुसरीने प्रयत्न केला असता ती सुद्धा बुडाली. दोघी बुडत असल्याचे दिसताच इतर तिघींनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाचही मुली त्यात बुडाल्या. यावेळी सहाव्या मुलीने लागलीच वस्तीवर धाव घेत तेथील नागरिकांना सर्व हकीकत सांगितली. नागरिकांनी लागलीच तलावाकडे धाव घेतली.

पाचही मुलींना अत्यवस्थ अवस्थेत तलावाच्या बाहेर काढण्यात आले. त्यांना उपचारासाठी तत्काळ फुलंब्री येथील रुग्णालयाकडे रवाना करण्यात आले. मात्र, वाटेतच पाचही मुलींचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. या घटनेने तळेगाव वाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 

अर्शान लतीफ पठाण ( १२ ), अल्फिया गौफखा पठाण ( १० ), शबाना असलम पठाण ( ८ ), सादिया असलं पठाण (१० ), नाझिया नवाज पठाण ( ८ ) अशी मृत मुलींची नावे आहेत. तर नाझिया असेफ पठाण ( ८ ) ही मुलगी बचावली आहे.  

टॅग्स :Deathमृत्यूdrowningपाण्यात बुडणेJalanaजालना