शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:07 IST

कुंभार पिंपळगावसह परिसरात पावसाचे आगमन झाले आणि गोदाकाठच्या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगावसह परिसरात पावसाचे आगमन झाले आणि गोदाकाठच्या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. सर्वच रस्ते चिखलमय झाले असून, रस्त्यावरून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे.घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या परिसरातील रस्ते हे रस्ते कच्चे रस्ते तयार झाले आहेत. गोदावरी नदीमुळे परिसरात उसाची लागवड अधिक असते. रस्ता खराब असल्याने ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावर माती, मुरुम टाकून दुरुस्त करण्यात आली होती.मान्सूनच्या पावसाने शनिवारी पहाटेपासून कुंभार पिंपळगाव भागात दमदार हजेरी लावली. पावसामुळे गोदाकाठच्या रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले असून, पाण्यामुळे चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. तसेच चिखलामुळे वाहने रस्ता सोडून खाली जाऊ लागले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करावेत, अशी मागणी होत आहे.कुंभार पिंपळगाव वरुन जाताना शिवणगाव रस्त्यावर गावानजीक एक डाव्या कालव्याच्या चारीचा पूल लागतो. तो पूल मागील सहा महिन्यापूर्वी जायकवाडी विभागाकडून पाण्याचा विसर्ग कमी होत असल्याने तोडण्यात आला. त्यानंतर तो पूल माती टाकून बुजविण्यात आला. मात्र; पावसामुळे रस्त्याची वाट लागली असून, या पुलावरून वाहने तर सोडा; बैलगाडी देखील जाऊ शकत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी एका चालकाने या पुलावरून वाहन घातले. मात्र, चिखलात ते वाहन फसले.दुपारी तीनपर्यंत प्रयत्न करूनही वाहन निघत नसल्याने अखेर जेसीबीच्या सहाय्याने वाहनाला चिखलातून काढावे लागले.याठिकाणी माती टाकून पूल बुजवल्याने चारीतून येणारे पाणी पुलाजवळ थांबणार आहे. त्यामुळे जवळच असलेल्या शहीद भगतसिंग शाळेत पाण्याचे तळे होण्याची शक्यता आहे. शाळा, ग्रामस्थांच्या वतीने जायकवाडी प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पुलाचे काम त्वरित न झाल्यास शिवणगावचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.कुं.पिंपळगाव : दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ताकुंभार पिंपळगाव ते शिवणगाव रस्ता झाला तर बीड व जालना जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या शिवणगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरुन वाहनांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे.शिवाय दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा रस्ता सुरळीत होऊन सर्वांचीच सोय होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागRainपाऊस