शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

पहिल्याच पावसात रस्त्यांची लागली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:07 IST

कुंभार पिंपळगावसह परिसरात पावसाचे आगमन झाले आणि गोदाकाठच्या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुंभार पिंपळगाव : कुंभार पिंपळगावसह परिसरात पावसाचे आगमन झाले आणि गोदाकाठच्या रस्त्यांची पूर्णत: वाट लागली. सर्वच रस्ते चिखलमय झाले असून, रस्त्यावरून वाट शोधताना कसरत करावी लागत आहे.घनसावंगी तालुक्यातील गोदाकाठच्या परिसरातील रस्ते हे रस्ते कच्चे रस्ते तयार झाले आहेत. गोदावरी नदीमुळे परिसरात उसाची लागवड अधिक असते. रस्ता खराब असल्याने ऊस वाहतुकीसाठी रस्त्यावर माती, मुरुम टाकून दुरुस्त करण्यात आली होती.मान्सूनच्या पावसाने शनिवारी पहाटेपासून कुंभार पिंपळगाव भागात दमदार हजेरी लावली. पावसामुळे गोदाकाठच्या रस्त्यावर सर्वत्र पाणी साचले असून, पाण्यामुळे चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. तसेच चिखलामुळे वाहने रस्ता सोडून खाली जाऊ लागले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या भागातील रस्ते मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करावेत, अशी मागणी होत आहे.कुंभार पिंपळगाव वरुन जाताना शिवणगाव रस्त्यावर गावानजीक एक डाव्या कालव्याच्या चारीचा पूल लागतो. तो पूल मागील सहा महिन्यापूर्वी जायकवाडी विभागाकडून पाण्याचा विसर्ग कमी होत असल्याने तोडण्यात आला. त्यानंतर तो पूल माती टाकून बुजविण्यात आला. मात्र; पावसामुळे रस्त्याची वाट लागली असून, या पुलावरून वाहने तर सोडा; बैलगाडी देखील जाऊ शकत नसल्याची स्थिती आहे. शनिवारी सकाळी एका चालकाने या पुलावरून वाहन घातले. मात्र, चिखलात ते वाहन फसले.दुपारी तीनपर्यंत प्रयत्न करूनही वाहन निघत नसल्याने अखेर जेसीबीच्या सहाय्याने वाहनाला चिखलातून काढावे लागले.याठिकाणी माती टाकून पूल बुजवल्याने चारीतून येणारे पाणी पुलाजवळ थांबणार आहे. त्यामुळे जवळच असलेल्या शहीद भगतसिंग शाळेत पाण्याचे तळे होण्याची शक्यता आहे. शाळा, ग्रामस्थांच्या वतीने जायकवाडी प्रशासनाकडे याबाबत तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. पुलाचे काम त्वरित न झाल्यास शिवणगावचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे.कुं.पिंपळगाव : दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ताकुंभार पिंपळगाव ते शिवणगाव रस्ता झाला तर बीड व जालना जिल्ह्याच्या मध्ये असलेल्या शिवणगाव येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरुन वाहनांना ये-जा करण्यासाठी सोयीचे होणार आहे.शिवाय दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा रस्ता सुरळीत होऊन सर्वांचीच सोय होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभागRainपाऊस