शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 11:39 IST

शेतक-यांची पहिली औद्योगिक वसाहत जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शेतक-यांची पहिली औद्योगिक वसाहत जिल्ह्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून यामाध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग प्रशस्त होणार असून, उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. यासंदभार्तील प्रस्ताव लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या आहेत.अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा शासनाचा संकल्प असून त्यादिशेने शासनाची वाटचाल सुरु आहे. यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून या कामाला गती देण्यात येत असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. गाव पातळीवर सूक्ष्म नियोजनातून यासाठी हाती घ्यावयाच्या प्रकल्पांची निश्चिती केली जात आहे. जिल्ह्याने पुढाकार घेऊन रुर्बन तसेच मानव विकास कार्यक्रमांतर्गत तयार केलेला कार्यक्रम त्यादिशेने टाकलेले एक चांगले पाऊल असल्याचे ते म्हणाले.शेतक-यांनी पिकवलेल्या उत्पादनांवर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून किंवा उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया केल्या जातील, त्याचे मूल्यवर्धन केले जाईल, यातून शेतकºयांचे उत्पन्न वाढेल, रोजगार संधीची निर्मिती होईल, ३०० कुटुंबांना याचा लाभ मिळेल, असे लोणीकर यांनी सांगितले.राज्यातील असा पहिलाच उपक्रमप्रस्तावित रुर्बन प्रकल्पामध्ये मूलभूत सोयी सुविधा, सर्व सुविधा युक्त ६० उद्योग, यंत्रसामग्री, प्रशिक्षण, क्षमतावृद्धी आणि सहाय्य या बाबींवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. यासाठी तीन वर्षे कालावधीचा आणि १८५ कोटी रुपये खचार्चा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी २० एकर जागा देखील उपलब्ध करून घेण्यात आली आहे. अशाप्रकारचा हा राज्यातील पहिलाच उपक्रम राहणार आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीMIDCएमआयडीसीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र