शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
बेस्ट बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
6
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
7
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
8
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
9
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
10
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
11
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
12
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
13
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
14
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
15
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
16
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
17
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
18
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
19
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
20
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार

अग्निशमनच्या गाडी विक्रीवरून ‘आगपाखड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 00:56 IST

अंबड पालिकेतील घनकचरा प्रकल्पाच्या टेंडरचे वादग्रस्त प्रकरण थंड होते न होते तोच पुन्हा एकदा अग्निशमन केंद्रातील बंब विक्रीच्या मुद्यावरून वादंग निर्माण झाले आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअंबड : अंबड पालिकेतील घनकचरा प्रकल्पाच्या टेंडरचे वादग्रस्त प्रकरण थंड होते न होते तोच पुन्हा एकदा अग्निशमन केंद्रातील बंब विक्रीच्या मुद्यावरून वादंग निर्माण झाले आहे. एकूणच यामुळे भाजपच्या ताब्यात असलेल्या पालिकेच्या सत्ताधाऱ्यांच्या कार्यप्रणालीवरच संशय व्यक्त होत आहे.अंबड पालिका सध्या या - ना त्या कारणाने चांगलीच चर्चेत आली आहे. स्वच्छ प्रशासनाचा नारा देणा-या भाजपकडून अंबड पालिकेत मात्र, नियमांना बगल देऊन कामे उरकण्याचा सपाटा लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अग्निशमन बंबांची विक्री करतांना त्याचे टेंडर काढले होते काय, तसेच ती गाडी विमा कंपनीने विकल्याचा दावा मुख्याधिकारी घोलप करत आहेत. परंतु ही गाडी एक ते सव्वा लाख रूपयांना विकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्या गाडीच्या भंगाराची किंमतही पाच लाख रूपयांच्या पुढेच आली असती, असे विरोधकांचे म्हणणे आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले. ही गाडी पालिकेतील सत्ताधा-याच्या नातेवाईकानेच खरेदी केल्याची जोरदार चर्चा पालिकेत मोठी चवीने होत आहे.दुसरीकडे यापूर्वीच घनकचरा प्रकल्पाचे टेंडर हे थेट १२५ टक्क्यांनी जास्तीचे काढण्यात आले होते. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेऊन अंबडच्या उपविभागीय अधिका-यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमून या प्रकरणाची चौकशी लावली होती. त्यातूनही पालिकेच्या कारभारावर शिंतोडे उडाले आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासन देण्याचे भाजपचे मुद्दे येथे कुठे गेलेत, असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे अंबड पालिकेच्या कारभारावर शंका घेतली जात असल्याचे वास्तव आहे. यामुळे अंबडवासीय देखील या प्रकारामुळे अवाक झाले आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाfireआगPoliticsराजकारण