शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

...अखेर परभणीकडे जाणारे पाणी थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:56 IST

निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.परभणी व पूर्णा शहराची तहान भागवण्यासाठी या निम्न दुधना प्रकल्पातून खाली पात्रात पाणी सोडण्यात आले होते. फेबु्रवारी महिन्यातच परभणी व पूर्णा या शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते.शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ या प्रकल्पातून तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चार दरवाजातून सुरू करण्यात आलेला विसर्ग बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास थांबविण्यात आला. यामुळे आता या धरणात २०.५ टक्के जिवंत साठा आहे तर एकूण ४५ टक्के पाणीसाठा आहे.या धरणावर परतूर सेलूसह अनेक खेड्यांची तहान अवलंबून आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा अवैध उपसा व अपव्यय टाळणे गरजेचे आहे.निम्न दुधना प्रकल्प हा ख-या अर्थाने जालना जिल्ह्यात असला तरी त्याचा प्रत्यक्ष लाक्ष हा प्रारंभीपासूनच परभणी, नांदेड जिल्ह्यातील काही भागाला होत आहे. जालना जिल्ह्याला या प्रकल्पातील केवळ बॅकवॉटरवर समाधान मानावे लागत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर जवळपास १ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च झालेला आहे. यामुळे जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून निघाल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प परभणी जिल्ह्यासाठी त्यावेळी तयार करण्यात आला होता की काय अशी शंका व्यक्त आहे. जेवढे पाणी सध्या शिल्लक आहे ते आता परतूर तालुक्यासाठी राखून ठेवण्याची मागणीही शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी