शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

...अखेर परभणीकडे जाणारे पाणी थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 00:56 IST

निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : निम्न दुधना प्रकल्पातून मागील नऊ दिवसापासून परभणीकडे सुरू असलेला पाण्याचा विसर्ग बुधवारी थांबवण्यात आला असून, आता धरणात केवळ २०.५ टक्के जिवंत पाणीसाठा राहीला आहे.परभणी व पूर्णा शहराची तहान भागवण्यासाठी या निम्न दुधना प्रकल्पातून खाली पात्रात पाणी सोडण्यात आले होते. फेबु्रवारी महिन्यातच परभणी व पूर्णा या शहरावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते.शहराच्या पाणी टंचाई निवारणार्थ या प्रकल्पातून तिसऱ्यांदा पाणी सोडण्यात आले आहे. ८ मे रोजी सायंकाळी ५ वाजता चार दरवाजातून सुरू करण्यात आलेला विसर्ग बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास थांबविण्यात आला. यामुळे आता या धरणात २०.५ टक्के जिवंत साठा आहे तर एकूण ४५ टक्के पाणीसाठा आहे.या धरणावर परतूर सेलूसह अनेक खेड्यांची तहान अवलंबून आहे. त्यामुळे या धरणातील पाण्याचा अवैध उपसा व अपव्यय टाळणे गरजेचे आहे.निम्न दुधना प्रकल्प हा ख-या अर्थाने जालना जिल्ह्यात असला तरी त्याचा प्रत्यक्ष लाक्ष हा प्रारंभीपासूनच परभणी, नांदेड जिल्ह्यातील काही भागाला होत आहे. जालना जिल्ह्याला या प्रकल्पातील केवळ बॅकवॉटरवर समाधान मानावे लागत आहे. आतापर्यंत या प्रकल्पावर जवळपास १ हजार कोटीपेक्षा अधिक खर्च झालेला आहे. यामुळे जालना जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून निघाल्यासारखे दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र हा प्रकल्प परभणी जिल्ह्यासाठी त्यावेळी तयार करण्यात आला होता की काय अशी शंका व्यक्त आहे. जेवढे पाणी सध्या शिल्लक आहे ते आता परतूर तालुक्यासाठी राखून ठेवण्याची मागणीही शेतक-यांनी केली आहे.

टॅग्स :DamधरणWaterपाणी