शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अखेर केदारखेडा कोल्हापुरी बंधाऱ्यावर बसले गेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 00:58 IST

केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्ककेदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील कोल्हापुरी बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे पाणी वाहून जात होते. याबाबत ‘लोकमत’ने रविवारी वृत्त प्रसिध्द केले होते. वृत्ताची दखल घेत रविवारी सकाळीच संबंधित विभागाने १०० गेट उपलब्ध करून ते बसविण्यासही सुरूवात केली आहे.दुष्काळाच्या झळा सोसणा-या केदारखेडा परिसरात गत पंधरा दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाला. या पावसामुळे पूर्णा नदीला पूर आला होता. केदारखेडा गावच्या शिवारातून वाहणा-या नदीवर कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र, या बंधा-याला दरवाजे नसल्याने पावसाचे येणारे पाणी नदीपात्रातून वाहून जात होते. केदारखेडा येथील पूर्णा नदीवर मोठा खर्च करुन तीन वर्षांपूर्वी बंधारा उभारण्यात आलेला आहे. मात्र, दोनच गेट आसल्याने नदीला आलेले पाणी वाहून जात होते. गतवर्षी नदीकाठावरील गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता आणि अता आलेले पाणी डोळया देखत वाहून जात असल्याने ग्रामस्थांची घालमेल सुरु होती. या अनुषंगाने शुक्रवारी गेट कोणत्या कारणाने टाकले जात नाही यासाठी विशेष बैठक घेतली. बैठकीतील विषय केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना सांगितला. याच बैठकीचा व सर्वसामन्यांची तळमळ पाहून ‘लोकमत’ने रविवारी ‘पाणी आले अन् वाहून चालले’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने तात्काळ प्रती चारी तीन प्रमाणे १०० गेट उपलब्ध करुन दिले आहेत.हे गेट रविवारी सकाळीच टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर. के. जाधव, अंबादास सहाने, श्रीराम जाधव, डिंगाबर तांबडे, गणेश तांबडे, रावसाहेब जाधव आदींची उपस्थिती होती. बंधा-याला गेट बसविले जात असल्याने या भागातील ग्रामस्थ व शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत.

टॅग्स :Lokmat Impactलोकमत इम्पॅक्टIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प