शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:01 IST

बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन २५० ते ३५० बालकांवर उपचार केले जात असून, अंतररूग्ण विभागातही २५ ते ३० बालके उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषत: तापाचे रूग्ण वाढले असून, खाजगी रूग्णालयेही फुल्ल होत आहेत. तापामुळे बालकांच्या प्लेटलेटवरही परिणाम होताना दिसत आहे.वातावरणातील बदलांमुळे गत काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ताप अधिक असल्याने डेंग्यूसदृश आजाराप्रमाणे प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. लहान बालकांना अचानक ताप येत असल्याने जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील बालरूग्ण उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या २५० ते ३०० वर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अंतररूग्ण विभागात उपचारासाठी दैनंदिन साधारणत: २० ते २५ बालके दाखल होत आहेत. शहरातील खाजगी रूग्णालयात अ‍ॅडमिट होणाºया बाल रूग्णांची संख्याही मोठी आहे.बदलते वातावरण, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ पाणी यासह इतर कारणांमुळे बाल रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एखाद्या बालकाच्या शरीरात अधिक काळ ताप राहिली तर डेंग्यूसह इतर आजाराची शक्यता असते. त्यामुळे बालके आजारी पडल्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरडा दिवस पाळणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक स्वच्छता, पौष्टिक अन्न खाणे, आहारात फळांचा, ताज्या भाज्या वाढविणे गरजेचे असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात डेंग्यूसारख्या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत. मुलांना तापासह इतर आजार असतील तर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरासह ग्रामीण भागात मच्छराचे प्रमाण वाढलेले आहे. बदलते वातावरण आणि मच्छरांमुळे बालकांसह वयोवृध्दही आजारी पडू लागले आहेत. विशेषत: बालकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजार जडत आहेत. शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. या आजाराची लागण होऊ नये, यासाठी पालकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळणे, घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, मुलांचे वेळोवेळी हात धुणे, त्यांच्या शारीरिक तपासणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय