शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाकाठी ३०० वर बालकांना ज्वर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:01 IST

बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : बदलत्या वातावरणामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन २५० ते ३५० बालकांवर उपचार केले जात असून, अंतररूग्ण विभागातही २५ ते ३० बालके उपचारासाठी दाखल होत आहेत. विशेषत: तापाचे रूग्ण वाढले असून, खाजगी रूग्णालयेही फुल्ल होत आहेत. तापामुळे बालकांच्या प्लेटलेटवरही परिणाम होताना दिसत आहे.वातावरणातील बदलांमुळे गत काही दिवसांपासून लहान मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकल्यासह इतर आजारांचे प्रमाण वाढले आहे. विशेषत: ताप अधिक असल्याने डेंग्यूसदृश आजाराप्रमाणे प्लेटलेट कमी होण्याचे प्रमाण दिसून येत आहे. लहान बालकांना अचानक ताप येत असल्याने जिल्हा रूग्णालयात शहरासह ग्रामीण भागातील बालरूग्ण उपचारासाठी येत आहेत. जिल्हा रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात दैनंदिन उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांची संख्या २५० ते ३०० वर असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अंतररूग्ण विभागात उपचारासाठी दैनंदिन साधारणत: २० ते २५ बालके दाखल होत आहेत. शहरातील खाजगी रूग्णालयात अ‍ॅडमिट होणाºया बाल रूग्णांची संख्याही मोठी आहे.बदलते वातावरण, डासांचा प्रादुर्भाव, अस्वच्छ पाणी यासह इतर कारणांमुळे बाल रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. एखाद्या बालकाच्या शरीरात अधिक काळ ताप राहिली तर डेंग्यूसह इतर आजाराची शक्यता असते. त्यामुळे बालके आजारी पडल्यानंतर तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ल्यानुसार औषधोपचार घेणे गरजेचे आहे. त्याशिवाय कोरडा दिवस पाळणे, हात स्वच्छ धुणे, शारीरिक स्वच्छता, पौष्टिक अन्न खाणे, आहारात फळांचा, ताज्या भाज्या वाढविणे गरजेचे असल्याचे जिल्हा रूग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा रूग्णालयात डेंग्यूसारख्या आजाराचे रूग्ण आढळून आलेले नाहीत. मुलांना तापासह इतर आजार असतील तर तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.शहरासह ग्रामीण भागात मच्छराचे प्रमाण वाढलेले आहे. बदलते वातावरण आणि मच्छरांमुळे बालकांसह वयोवृध्दही आजारी पडू लागले आहेत. विशेषत: बालकांना ताप, सर्दी, खोकला आदी आजार जडत आहेत. शासकीय रूग्णालयासह खाजगी रूग्णालयात रूग्णांची मोठी गर्दी होत आहे. या आजाराची लागण होऊ नये, यासाठी पालकांनी आवश्यक ती दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेषत: प्रत्येक आठवड्याला कोरडा दिवस पाळणे, घरासह परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साचू न देणे, मुलांचे वेळोवेळी हात धुणे, त्यांच्या शारीरिक तपासणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय