शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
2
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
3
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
4
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
5
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
6
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
7
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
8
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
9
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
10
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
11
बिहारमध्ये २०१० च्या इतिहासाची पुनरावृत्ती; नितीश कुमार अन् भाजपाने पुन्हा केली जबरदस्त कमाल
12
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
13
टायर किंग एमआरएफची दमदार कामगिरी; प्रत्येक शेअरवर मिळणार इतका लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
14
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
15
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! ५ विकेट्सचा डाव साधत सेट केले अनेक विक्रम
16
भरला संसार विस्कटून टाकला! आधी पत्नी अन् तीन मुलांना संपवलं; नंतर स्वतःचाही जीव घेतला
17
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
18
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
19
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
20
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:43 IST

अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. नवीन बसची मागणी करूनही याकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशात संताप आहे.अंबड आणि घनसावंगीसाठी संयुक्त असणाऱ्या अंबड आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी ६५ बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १४ बसगाड्या आहेत. गाड्याच देखभाल दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी आगारात १० मेकॅनिक आहेत. तर वाहक व चालक मिळून २५० कर्मचारी सेवा देत आहे. या आगारातून पुणे, अकोला, धुळे, नाशिक आदी ठिकाणी जलदगतीच्या बस मुक्कामी जातात. मात्र अनेक वेळा या बस रस्त्यातच अनेक वेळा नादुस्त होत असल्याचे चालक वाहक सांगतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. तसेच चालक वाहकांचे हाल होते. दिवसेंदिवस तिकीट दर वाढत आहे. किलोमीटरला जवळपास दीड रुपया भाडे आकारले जात आहे. असे असतांना प्रवाशांना सुविधा देण्यास अंबड आगार कमी पडत आहे. बहुतांश बस मोडकडीस आलेल्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या बसचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थीनींना धोकादायक प्रवास करावा लागतो. आगारातील बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या ,साईड ग्लास, व खिडक्यांना दोरीने बांधून ठेवून कसातरी आधार दिला आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीची भिती असते. याबाबत पालक, नागरिकांनी आगार प्रमुखाकडे निेवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.सर्व बस मोडकळीस आलेल्या आहेत. यामध्ये पंधरा लांबपल्याच्या बसचा समावेश आहे. एटी महामंडळाच्या बसमधून प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र आगारात बसची अवस्था बघून प्रवाशी खाजगी वाहनकाकडे वळत आहेत.विभागीय नियंत्रकाकडून अंबड आगाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षापासून नवीस बस देण्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंबड आणि घनसावंगी हे जिल्ह्यातील महत्वाचे तालुका आहेत.या तालुक्याना महत्वाचे गावे जोडलेली आहेत. मात्र प्रवाशांना मोडक्या- तोडक्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. खटाºया बसमध्ये बसल्यानंतर होणारा आवाज यामुळे ट्रॅक्टरमधून प्रवास करत आहे की काय, असा अनूभव प्रवाशी व्यक्त करतात. असे असतांना ग्रामीण भागातील नागरिकांना नाईलाजाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.तापमान ४० अंशापर्यत जात आहे. बसला खिडक्या नसल्याने उन्ह आणि गरम वाºयामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.अंबड आगाराकडून विभागीय नियंत्रकाकडे नवीन गाड्याचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूक