शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:43 IST

अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. नवीन बसची मागणी करूनही याकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशात संताप आहे.अंबड आणि घनसावंगीसाठी संयुक्त असणाऱ्या अंबड आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी ६५ बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १४ बसगाड्या आहेत. गाड्याच देखभाल दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी आगारात १० मेकॅनिक आहेत. तर वाहक व चालक मिळून २५० कर्मचारी सेवा देत आहे. या आगारातून पुणे, अकोला, धुळे, नाशिक आदी ठिकाणी जलदगतीच्या बस मुक्कामी जातात. मात्र अनेक वेळा या बस रस्त्यातच अनेक वेळा नादुस्त होत असल्याचे चालक वाहक सांगतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. तसेच चालक वाहकांचे हाल होते. दिवसेंदिवस तिकीट दर वाढत आहे. किलोमीटरला जवळपास दीड रुपया भाडे आकारले जात आहे. असे असतांना प्रवाशांना सुविधा देण्यास अंबड आगार कमी पडत आहे. बहुतांश बस मोडकडीस आलेल्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या बसचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थीनींना धोकादायक प्रवास करावा लागतो. आगारातील बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या ,साईड ग्लास, व खिडक्यांना दोरीने बांधून ठेवून कसातरी आधार दिला आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीची भिती असते. याबाबत पालक, नागरिकांनी आगार प्रमुखाकडे निेवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.सर्व बस मोडकळीस आलेल्या आहेत. यामध्ये पंधरा लांबपल्याच्या बसचा समावेश आहे. एटी महामंडळाच्या बसमधून प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र आगारात बसची अवस्था बघून प्रवाशी खाजगी वाहनकाकडे वळत आहेत.विभागीय नियंत्रकाकडून अंबड आगाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षापासून नवीस बस देण्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंबड आणि घनसावंगी हे जिल्ह्यातील महत्वाचे तालुका आहेत.या तालुक्याना महत्वाचे गावे जोडलेली आहेत. मात्र प्रवाशांना मोडक्या- तोडक्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. खटाºया बसमध्ये बसल्यानंतर होणारा आवाज यामुळे ट्रॅक्टरमधून प्रवास करत आहे की काय, असा अनूभव प्रवाशी व्यक्त करतात. असे असतांना ग्रामीण भागातील नागरिकांना नाईलाजाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.तापमान ४० अंशापर्यत जात आहे. बसला खिडक्या नसल्याने उन्ह आणि गरम वाºयामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.अंबड आगाराकडून विभागीय नियंत्रकाकडे नवीन गाड्याचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूक