शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
4
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
5
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
6
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
7
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
8
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
9
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
10
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
11
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
12
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
13
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
14
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
15
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
16
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
17
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
18
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
19
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
20
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं

कालबाह्य बसेसमधून जीवघेणा प्रवास...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:43 IST

अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कघनसावंगी : अंबड आगारात असलेल्या बहुतांश बस कालबाह्य झाल्या आहे. या मोडक्या -तोडक्या बसमधून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे मोठा अपघात होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. नवीन बसची मागणी करूनही याकडे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशात संताप आहे.अंबड आणि घनसावंगीसाठी संयुक्त असणाऱ्या अंबड आगारात प्रवाशांच्या सेवेसाठी ६५ बसेस आहेत. त्यात मानव विकास मिशनच्या १४ बसगाड्या आहेत. गाड्याच देखभाल दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी आगारात १० मेकॅनिक आहेत. तर वाहक व चालक मिळून २५० कर्मचारी सेवा देत आहे. या आगारातून पुणे, अकोला, धुळे, नाशिक आदी ठिकाणी जलदगतीच्या बस मुक्कामी जातात. मात्र अनेक वेळा या बस रस्त्यातच अनेक वेळा नादुस्त होत असल्याचे चालक वाहक सांगतात. याचा नाहक त्रास प्रवाशांना सोसावा लागतो. तसेच चालक वाहकांचे हाल होते. दिवसेंदिवस तिकीट दर वाढत आहे. किलोमीटरला जवळपास दीड रुपया भाडे आकारले जात आहे. असे असतांना प्रवाशांना सुविधा देण्यास अंबड आगार कमी पडत आहे. बहुतांश बस मोडकडीस आलेल्या आहेत. यामध्ये मानव विकास मिशनच्या बसचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थीनींना धोकादायक प्रवास करावा लागतो. आगारातील बस अस्वच्छ, मोडकळीस आलेल्या ,साईड ग्लास, व खिडक्यांना दोरीने बांधून ठेवून कसातरी आधार दिला आहे. यामुळे अपघात होण्याची नेहमीची भिती असते. याबाबत पालक, नागरिकांनी आगार प्रमुखाकडे निेवेदन देऊन याकडे लक्ष देण्याची मागणी केली मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.सर्व बस मोडकळीस आलेल्या आहेत. यामध्ये पंधरा लांबपल्याच्या बसचा समावेश आहे. एटी महामंडळाच्या बसमधून प्रवाशांनी प्रवास करावा यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात. मात्र आगारात बसची अवस्था बघून प्रवाशी खाजगी वाहनकाकडे वळत आहेत.विभागीय नियंत्रकाकडून अंबड आगाराकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गेल्या अनेक वर्षापासून नवीस बस देण्याची मागणी करण्यात आली मात्र याकडे कायम दुर्लक्ष करण्यात येत आहे. अंबड आणि घनसावंगी हे जिल्ह्यातील महत्वाचे तालुका आहेत.या तालुक्याना महत्वाचे गावे जोडलेली आहेत. मात्र प्रवाशांना मोडक्या- तोडक्या बसमधून धोकादायक प्रवास करावा लागत आहे. खटाºया बसमध्ये बसल्यानंतर होणारा आवाज यामुळे ट्रॅक्टरमधून प्रवास करत आहे की काय, असा अनूभव प्रवाशी व्यक्त करतात. असे असतांना ग्रामीण भागातील नागरिकांना नाईलाजाने धोकादायक प्रवास करावा लागत आहे.तापमान ४० अंशापर्यत जात आहे. बसला खिडक्या नसल्याने उन्ह आणि गरम वाºयामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.अंबड आगाराकडून विभागीय नियंत्रकाकडे नवीन गाड्याचा प्रस्ताव पाठविल्याची माहिती आहे.

टॅग्स :state transportएसटीroad transportरस्ते वाहतूक