शहरं
Join us  
Trending Stories
1
२० वर्षांचा ईएमआय १५ वर्षांत संपणार, घर-वाहन कर्ज झाले आणखी स्वस्त, ‘आरबीआय’कडून रेपो दरात कपात
2
इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
3
RBI नं रेपो दरात कपात करताच 'या' दोन सरकारी बँकांनी कर्ज केली स्वस्त; पाहा काय आहेत नवे दर?
4
आजचे राशीभविष्य, ०६ डिसेंबर २०२५: कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उद्भवतील, नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता
5
रशिया भारताला अखंड तेलपुरवठा करत राहणार; आर्थिक सहकार्याचा ५ वर्षांचा आराखडा निश्चित
6
अजबच! अचानक खेळपट्टीने गिळला चेंडू आणि सामनाच करावा लागला रद्द, WBBL मध्ये नेमकं काय घडलं?   
7
आरक्षण देणाऱ्या मुख्यमंत्र्यांप्रति अनाथ कृतज्ञ होतात तेव्हा...; वर्षा निवासस्थानी पार पडला भावुक सोहळा
8
विशेष लेख: ‘आधी, नंतर आणि शेवटीही फक्त भारतीयच!’  
9
वर्षात चार वेळा ईएमआय झाला कमी!घर, कार घेणे स्वस्त; आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
10
‘नगरां’च्या निवडणुकीची २१ डिसेंबरलाच मतमोजणी; खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम
11
पुतीन परतले, पुढे...?
12
शाकाहारी असाल तरच तुम्हाला फ्लॅट देणार! मराठी माणसाला नाकारले घर?
13
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
शिक्षकांचे संच मान्यता निकष, टीईटी सक्तीविरोधात आंदोलन; मुंबईमध्ये शाळा बंदला संमिश्र प्रतिसाद
15
कामगार युनियनवरून ठाकरेंची शिवसेना-भाजपमध्ये राडा, वरळीत तणाव; पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज
16
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
17
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
18
सेवा-समर्पणाच्या वाटेवरच्या ध्येयनिष्ठ प्रवाशाची कहाणी
19
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
20
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

"शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही, आता रस्त्यावर येऊन सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील": मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 14:32 IST

मराठा आंदोलनानंतर आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जरांगे पाटील आक्रमक; सरकारला दिला थेट इशारा!

वडीगोद्री (जालना) : शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नुकसान भरपाईच्या निधीवरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी सकाळी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. "शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता रस्त्यावर उतरून सरकारचे 'कपडे फाडावेच' लागतील, त्याशिवाय न्याय मिळणार नाही," अशा अत्यंत कठोर शब्दांत जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईचा निधी अद्यापही जमा झाला नाही, या मुद्द्यावरून जरांगे पाटील यांनी सरकारला घेरले. ते म्हणाले, "शेतकऱ्यावर जेव्हा मोठे संकट येते, तेव्हा त्याला आर्थिक हातभार लावणे ही सरकारची जबाबदारी असते. मात्र, हे सरकार केवळ तात्पुरता आनंद देणारे आहे. मागील ७५ वर्षांपासून हेच सुरू आहे, फक्त आशेला लावायचे."

लवकरच मोठे आंदोलन:यावेळी जरांगे पाटील यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, परंतु लगेचच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला. दिवाळी पाडवा आणि भाऊबीज झाल्यानंतर ते शेतकरी तज्ज्ञ आणि संघटनांसोबत आंतरवाली सराटी येथे बैठक घेणार आहेत. या बैठकीनंतर लवकरच तारीख जाहीर करून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी एक मोठे आंदोलन उभे करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. "शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आपण सर्वांनी आपला सन्मान सोडून द्यायचा आहे," असे आवाहनही त्यांनी केले.

'भुजबळ म्हणजे फुसका फटाका':यावेळी त्यांनी ओबीसी नेत्यांवरही टीकास्त्र सोडले. "भुजबळ म्हणजे अलीबाबा फुसका फटाका आहे, तो वाजत नाही," अशा शब्दांत त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. ओबीसी नेत्यांची सध्याची धडपड केवळ त्यांच्या राजकीय अस्तित्वासाठी सुरू असून, त्यांना ओबीसी समाजाचे काही देणेघेणे नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

आरक्षण आणि फडणवीसांवर विश्वास:मराठा आरक्षणाच्या जीआरबद्दल बोलताना ते म्हणाले की, तो जीआर कोणीही रद्द करू शकत नाही आणि त्याला हात लावायला कोणाच्या बापाचं टप्पर नाही. मराठवाड्यातील मराठा समाज या जीआरमुळे एक ना एक दिवस १०० टक्के आरक्षणात जाणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करताना ते म्हणाले, "फडणवीस साहेबांवर मराठ्यांचा विश्वास बसला आहे, तो त्यांनी ढळू देऊ नये. जीआर 'ओके' आहे, थोडाफार बिघडला असेल तर तो दुरुस्त करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. फक्त प्रमाणपत्र वितरित होणे गरजेचे आहे."कुणबी-मराठा वादावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, ते जातवान कुणबी मराठा असून, दीडशे वर्षांपासूनच्या आरक्षणाला होणारा विरोध पाहून आता विरोधकांबद्दल घृणा यायला लागली आहे. त्यांनी तायवाडे यांच्या वक्तव्यावरही तीव्र प्रतिक्रिया दिली.

तुटकी-मुटकी दिवाळी साजरी करा:"शेतकऱ्यांनी काही का होईना, तुटकी मुटकी दिवाळी साजरी करावी," असे भावनिक आवाहन त्यांनी केले. परंतु, सरकार जाणूनबुजून शेतकऱ्यांना मदत करत नाही, तात्पुरता आनंद देत आहे. त्यामुळे आता सगळे शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांना एकत्र येऊन रस्त्यावर यावे लागेल आणि सरकारचे कपडे फाडावेच लागणार आहेत, पर्याय नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Patil: Farmers need to protest to get justice.

Web Summary : Manoj Jarange Patil criticized the government for neglecting farmers' compensation. He warned of a major protest after Diwali if funds aren't disbursed. He also attacked OBC leaders and expressed confidence in the Maratha reservation and Devendra Fadnavis's commitment.
टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलJalanaजालना