शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पाठविला किलोभर कापूस; आयात-निर्यात धोरणाचा अनोखा निषेध

By दिपक ढोले  | Updated: May 26, 2023 18:53 IST

शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले.

जालना : केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मरावे की जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सरकार कापसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात असमर्थ झाल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चक्क एक किलो कापूस शुक्रवारी पाठविला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहनत करून कापूस, सोयाबीन, कांदा आदी पिके मोठ्या प्रमाणात पिकवली. ज्यावेळेस ही पीक निघाले; त्यावेळेस सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा मोठा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले. परंतु, पिकांच्या भावात वाढ झाली नाही. 

केंद्र सरकारने चुकीचे धोरण आखत कापसाच्या गाठी आणि तेलाची आयात केल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ ओढवली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा निषेध केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक किलो कापूस भेट म्हणून पाठवला आहे. यावेळी दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, रामेश्वर गव्हाळे, सुरेश पवार, पांडुरंग भोसले, अंकुश लकडे, भरत लकडे, दत्तात्रय लकडे, अशोक आटोळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalanaजालनाcottonकापूसprime ministerपंतप्रधानFarmerशेतकरी