शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

शेतकऱ्यांनी पंतप्रधानांना पाठविला किलोभर कापूस; आयात-निर्यात धोरणाचा अनोखा निषेध

By दिपक ढोले  | Updated: May 26, 2023 18:53 IST

शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले.

जालना : केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यातीच्या चुकीच्या धोरणामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे आधीच मेटाकुटीस आलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मरावे की जगावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सरकार कापसाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात असमर्थ झाल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चक्क एक किलो कापूस शुक्रवारी पाठविला आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मेहनत करून कापूस, सोयाबीन, कांदा आदी पिके मोठ्या प्रमाणात पिकवली. ज्यावेळेस ही पीक निघाले; त्यावेळेस सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा मोठा फटका बसला. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना गतवर्षीच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन हे घरात साठवून ठेवले. परंतु, पिकांच्या भावात वाढ झाली नाही. 

केंद्र सरकारने चुकीचे धोरण आखत कापसाच्या गाठी आणि तेलाची आयात केल्याने शेतकऱ्यांवर ही वेळ ओढवली असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणाचा निषेध केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक किलो कापूस भेट म्हणून पाठवला आहे. यावेळी दत्तात्रय कदम, शिवाजी लकडे, रामेश्वर गव्हाळे, सुरेश पवार, पांडुरंग भोसले, अंकुश लकडे, भरत लकडे, दत्तात्रय लकडे, अशोक आटोळे आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Jalanaजालनाcottonकापूसprime ministerपंतप्रधानFarmerशेतकरी