शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना लाल मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:46 IST

आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे.

रवींद्र लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपारध : काही तरी वेगळे करुन दाखविण्याच्या तुमच्यात धमक असेल, आणि त्याला कष्टाची जोड दिल्यास तुम्हाला कोणत्याची क्षेत्रात यश नक्की मिळते. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे. भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील संदीप काटोले या तरुण शेतक-याने ही किमया करुन दाखविल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.मिरचीचे आगार म्हणून पारध परिसराची ओळख आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. तर काही शेतक-यांनी उपलब्ध पाण्यावर मिरची पीक जगविण्याची धडपड केली. मात्र अनेकांच्या हाती निराशा आली. मात्र याला अपवाद ठरले युवा शेतकरी संदीप काटोले. आपल्या शेतात पाणी नसल्याने काटोले यांनी इतर शेतक-यांची बारा एकर जमीन बटाईने केली. त्या शेतीत मिरची लागवड करुन आतापर्यंत त्या मिरचीतून ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे या शेतक-याने इतर शेतक-यांसमोर एक वेगळा आदर्श उभा केला असल्याने परिसरातील शेतकरी काटोले यांचे कौतुक करु लागले आहेत. काटोले यांच्याकडे पंधरा एकर शेती आहे. त्यांनी तीन एकरात आपल्या भावाच्या मदतीने टरबूज तर तीन एकरांत वांग्याची लागवड केली आहे. पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत कमी खर्चात जास्त उत्पादन निघावे म्हणून काटोले यांनी निंबोळा येथील शेतकरी अनिल देशपांडे यांची बारा एकर शेत जमीन बटाईने केली. या शेतीत जून महिन्यातच बारा एकरात सव्वा लाख मिरचीच्या रोपाची ठिंबकद्वारे लागवड केली. लागवडीपासून ते आतापर्यंत साडे नऊ लाख रुपये खर्च झाला असल्याचे या शेतक-याने सांगितले आहे. दरम्यान, लाल मिरचीतून काही तरी हाती पडेल यासाठी त्यांनी दीड महिन्यापासून मिरची न तोडता ती झाडावरच लाल होऊ दिली. गेल्या तीन दिवसांपूर्वी ती तोडली असता तब्बल सहाशे क्विंटल मिरची निघाली. सध्या लाल मिरचीला नागपूर, मध्य प्रदेश, पुणे, नगर, नंदुरबार इ. बाजारपेठेत दहा ते बारा हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी