शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

शेतकऱ्यांना लाल मिरचीने तारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:46 IST

आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे.

रवींद्र लोखंडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपारध : काही तरी वेगळे करुन दाखविण्याच्या तुमच्यात धमक असेल, आणि त्याला कष्टाची जोड दिल्यास तुम्हाला कोणत्याची क्षेत्रात यश नक्की मिळते. आपल्याकडे पुरेशा प्रमाणात शेतकरी नसताना बटाईने १२ एकर शेती करुन मिरची लागवडीतून तब्बल ४६ लाख रुपयांचे उत्पन्न काढले आहे. भोकरदन तालुक्यातील पारध बु. येथील संदीप काटोले या तरुण शेतक-याने ही किमया करुन दाखविल्याने परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.मिरचीचे आगार म्हणून पारध परिसराची ओळख आहे. मात्र यंदा कमी पावसामुळे मिरची उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले होते. तर काही शेतक-यांनी उपलब्ध पाण्यावर मिरची पीक जगविण्याची धडपड केली. मात्र अनेकांच्या हाती निराशा आली. मात्र याला अपवाद ठरले युवा शेतकरी संदीप काटोले. आपल्या शेतात पाणी नसल्याने काटोले यांनी इतर शेतक-यांची बारा एकर जमीन बटाईने केली. त्या शेतीत मिरची लागवड करुन आतापर्यंत त्या मिरचीतून ४५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यामुळे या शेतक-याने इतर शेतक-यांसमोर एक वेगळा आदर्श उभा केला असल्याने परिसरातील शेतकरी काटोले यांचे कौतुक करु लागले आहेत. काटोले यांच्याकडे पंधरा एकर शेती आहे. त्यांनी तीन एकरात आपल्या भावाच्या मदतीने टरबूज तर तीन एकरांत वांग्याची लागवड केली आहे. पारंपरिक शेती पध्दतीला फाटा देत कमी खर्चात जास्त उत्पादन निघावे म्हणून काटोले यांनी निंबोळा येथील शेतकरी अनिल देशपांडे यांची बारा एकर शेत जमीन बटाईने केली. या शेतीत जून महिन्यातच बारा एकरात सव्वा लाख मिरचीच्या रोपाची ठिंबकद्वारे लागवड केली. लागवडीपासून ते आतापर्यंत साडे नऊ लाख रुपये खर्च झाला असल्याचे या शेतक-याने सांगितले आहे. दरम्यान, लाल मिरचीतून काही तरी हाती पडेल यासाठी त्यांनी दीड महिन्यापासून मिरची न तोडता ती झाडावरच लाल होऊ दिली. गेल्या तीन दिवसांपूर्वी ती तोडली असता तब्बल सहाशे क्विंटल मिरची निघाली. सध्या लाल मिरचीला नागपूर, मध्य प्रदेश, पुणे, नगर, नंदुरबार इ. बाजारपेठेत दहा ते बारा हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी