शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

पीककर्जासाठी शेतकऱ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:06 IST

बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आहे.आतापर्यंत केवळ तीन टक्के पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील शेतक-यांना येत्या खरीप आणि रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपये ...

बाबासाहेब म्हस्के।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. मात्र, अनेक बँकांमध्ये अपुरा कर्मचारी वर्ग, तांत्रिक अडचणींमुळे कर्जवाटपाची प्रकिया संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे बँकांमध्ये शेतक-यांचा रांगा पहायला मिळत आहे.आतापर्यंत केवळ तीन टक्के पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे.जिल्ह्यातील शेतक-यांना येत्या खरीप आणि रबी हंगामासाठी १४६८ कोटी रुपये कृषी कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार शेतकरी संख्या असून अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतक-यांची संख्या चार लाख सात हजार आहे. या आर्थिक वर्षात बहुतांश थकबाकीदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्यामुळे ते नव्याने पीककर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत कृषी पतपुरवठ्याच्या रकमेमध्ये तब्बल ५५ कोटी ४४ लाख रुपयांनी वाढ करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ६२ शाखांसह राष्ट्रीयीकृत व खाजगी बँकामधून प्रत्यक्ष कर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. खरीप हंगात तोंडावर आल्यामुळे बी-बियाणे, खते व अन्य साहित्य खरेदीसाठी पैशाची गरज असल्यामुळे शेतकरी बँकेत गर्दी करत आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांमधील अपुरा कर्मचारी वर्ग, बँकेच्या आॅनलाइन कामकाज प्रणालीमध्ये येणारा व्यत्यय यामुळे पीककर्ज वाटप संथ गतीने सुरू आहेत. त्याचबरोबर पीककर्जासाठी आवश्यक सातबारा, एकूण जमिनीचा दाखला, फेरफार नक्कल, जमिनीच्या चतु:सीमा, मूल्यांकन इ. कागदपत्रे गोळा करताना शेतक-यांची दमछाक होत आहे. अनेक गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक येत नसल्याने शेतक-यांना कागदपत्रासाठी शहरात यावे लागत आहे. ग्रामीण भागात आपले सरकार पोर्टलवरील सातबारा मिळविताना अडचणी येत आहेत. राष्ट्रीयीकृत व जिल्हा मध्यवर्ती बँक मिळून १७ मे पर्यंत ४५ कोटींच्या पीककर्जाचे वाटप झाले आहे. पीककर्ज वाटपात जिल्हा बँक आघाडीवर असून, बँकेने ११ हजार शेतकºयांना २३ कोटी ९२ लाखांच्या पीकर्जाचे वाटप केले आहे. शेतक-यांची अडचण लक्षात घेता पीककर्ज वाटपाचे काम बँकांनी प्राधान्याने करण्याची गरज आहे.बँकांना सूचना : यंदा पात्र शेतकरी वाढलेकर्जमाफी मिळाल्यामुळे यंदा सुमारे ९५ हजार शेतकरी नव्याने कर्ज घेण्यास पात्र ठरले आहेत. सर्व बँकांना कृषी कर्जाचे प्राधान्याने वाटप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ४५ कोटींचे पीककर्ज वाटप पूर्ण झाले आहे, असे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना