शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

विष घेऊनही शेतकऱ्याचा प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:24 IST

पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी जी म्हण मराठीत रूढ झाली आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आला आहे. पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत. कळकुंबे हे बुधवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात याचा पाठपुरावा करण्यासाठी आल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांची बाजू ऐकून घेत पुन्हा एका सर्व यंत्रणांना सतर्क करून पुढील आठवड्यात यावर विशेष बैठक बोलावली आहे.कळकुंबे यांची अंतरवाला-सिंदखेड येथे शेतजमीन होती. गटबांधणी करताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा साधारपणे १९७० मध्ये झाला होता.त्यावेळी ते लहान होते. त्यामुळे त्यांचे नाव सातबारावर अल्पज्ञानी म्हणून आले होते. त्यावेळी शासनाने गटबांधणी दरम्यान ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करणे शिल्लक आहेत, अशांना ४० दिवसात अपील दाखल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कळकुंबे यांच्याकडून कुठलाच आक्षेप आला नाही. त्यामुळे त्यावेळी हे प्रकरण थंड बस्त्यात पडले. सज्ञान झाल्यावर संबंधित दत्तू कळकुंबे यांनी साधारपणे १९८५ पासून आपले नाव वडिलो पार्जित शेत जमिनीच्या सातबाराच्या उताºयावर यावे म्हणून महसूल तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.नंतर अनेकवेळा शासन दरबारी वेगवेगळ्या कार्यालयात या संदर्भात दाद मागितली. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला होता. तेथेही निकाल हा कळकुंबे यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे कळकुंबे यांनी आता या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे अशी विनंती बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळकुंबे यांना केली. तसेच वेगवेगळ्या यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचा-यांना बोलावून त्यांना यात काही करता येते काय, या बाबतही चर्चा केली. दरम्यान जलप्रकल्प उभारणीसाठी त्यांच्या गावातील अनेकांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. मुलाला धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून तरी मला आता मदत हवी अशी आर्त विनंती कळकुंबे यांनी वायाळ यांच्याकडे केली. मात्र, त्यासाठी आवश्यक ती सर्व कागपत्र शोधून त्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाशी संदर्भातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बैठकीस बोलावून त्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कळकुंबे यांना वायाळ यांनी दिले.शेतकरी खिन्न : जावे तरी कुठे ?आजही कळकुंबे हे त्यांच्याकडे असलेले सर्व कागदपत्र वायाळ यांना दाखवून काहीही करा, पण मला मदत करा अशी विनंती करताना दिसून आले. एकूणच हा कळकुंबे यांचा गंभीर प्रश्न असतांना आणि संबंधित शेतक-याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विषारी द्रव घेतल्या नंतर आता याला पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही न्याय मिळत नसल्याने आपण खिन्न झालो असल्याचे त्यांनी कळकुंबे यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना