शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

विष घेऊनही शेतकऱ्याचा प्रश्न सुटेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:24 IST

पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी जी म्हण मराठीत रूढ झाली आहे, त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा जालना जिल्ह्यात आला आहे. पाच महिन्यापूर्वी जालना तालुक्यातील अंतरवाला-सिंदखेड येथील दत्तू यशवंतराव कळकुंबे यांनी सातबाराच्या उता-यावर त्यांचे नाव येत नसल्याच्या मुद्यावरून तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांच्या दालनात विषारी द्रव घेतले होते. त्याला आज पाच महिने झाले आहेत. कळकुंबे हे बुधवारी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात याचा पाठपुरावा करण्यासाठी आल्यावर निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी त्यांची बाजू ऐकून घेत पुन्हा एका सर्व यंत्रणांना सतर्क करून पुढील आठवड्यात यावर विशेष बैठक बोलावली आहे.कळकुंबे यांची अंतरवाला-सिंदखेड येथे शेतजमीन होती. गटबांधणी करताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू हा साधारपणे १९७० मध्ये झाला होता.त्यावेळी ते लहान होते. त्यामुळे त्यांचे नाव सातबारावर अल्पज्ञानी म्हणून आले होते. त्यावेळी शासनाने गटबांधणी दरम्यान ज्या काही शेतकऱ्यांच्या जमिनी नावावर करणे शिल्लक आहेत, अशांना ४० दिवसात अपील दाखल करण्याचे निर्देश दिले होते. परंतु कळकुंबे यांच्याकडून कुठलाच आक्षेप आला नाही. त्यामुळे त्यावेळी हे प्रकरण थंड बस्त्यात पडले. सज्ञान झाल्यावर संबंधित दत्तू कळकुंबे यांनी साधारपणे १९८५ पासून आपले नाव वडिलो पार्जित शेत जमिनीच्या सातबाराच्या उताºयावर यावे म्हणून महसूल तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडे पाठपुरावा केला होता.नंतर अनेकवेळा शासन दरबारी वेगवेगळ्या कार्यालयात या संदर्भात दाद मागितली. विशेष म्हणजे दिवाणी न्यायालयातही दावा दाखल केला होता. तेथेही निकाल हा कळकुंबे यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे कळकुंबे यांनी आता या निकालाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे अशी विनंती बुधवारी निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी कळकुंबे यांना केली. तसेच वेगवेगळ्या यंत्रणांच्या अधिकारी, कर्मचा-यांना बोलावून त्यांना यात काही करता येते काय, या बाबतही चर्चा केली. दरम्यान जलप्रकल्प उभारणीसाठी त्यांच्या गावातील अनेकांच्या शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. मुलाला धरणग्रस्ताचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून तरी मला आता मदत हवी अशी आर्त विनंती कळकुंबे यांनी वायाळ यांच्याकडे केली. मात्र, त्यासाठी आवश्यक ती सर्व कागपत्र शोधून त्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या प्रकरणाशी संदर्भातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांना बैठकीस बोलावून त्यात निर्णय घेऊ, असे आश्वासन कळकुंबे यांना वायाळ यांनी दिले.शेतकरी खिन्न : जावे तरी कुठे ?आजही कळकुंबे हे त्यांच्याकडे असलेले सर्व कागदपत्र वायाळ यांना दाखवून काहीही करा, पण मला मदत करा अशी विनंती करताना दिसून आले. एकूणच हा कळकुंबे यांचा गंभीर प्रश्न असतांना आणि संबंधित शेतक-याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात विषारी द्रव घेतल्या नंतर आता याला पाच महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही न्याय मिळत नसल्याने आपण खिन्न झालो असल्याचे त्यांनी कळकुंबे यांनी यावेळी नमूद केले.

टॅग्स :Suicideआत्महत्याFarmerशेतकरीJalna collector officeजिल्हाधिकारी कार्यालय जालना