शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
4
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
5
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
6
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
7
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
8
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
9
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
10
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
11
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
12
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
13
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
14
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
15
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
16
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
17
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
18
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
19
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
20
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

अपघात विम्याबाबत शेतकरी अनभिज्ञ; तीन वर्षांत जालन्यातील केवळ १४१ शेतकऱ्यांना योजनेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2020 15:51 IST

अपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात.

ठळक मुद्देविविध कारणांमुळे ३९ प्रस्ताव बाद 

जालना : शासनाच्या विविध योजना शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आहेत; परंतु अनेक योजना जिल्हा व तालुका पातळीवरील उदासीन प्रशासकीय यंत्रणेमुळे खितपत पडलेल्या आहेत. याचाच प्रत्यय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत आला आहे. या योजनेविषयी ग्रामीण भागात फारशी जनजागृती नसल्याने मागील तीन वर्षांत जिल्ह्यात केवळ १४१ जणांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. तर कागदपत्रांअभावी ३९ प्रस्ताव बाद करण्यात आले आहेत. 

शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा रस्ता किंवा रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, सर्पदंश, विंचू दंश, खून, उंचावरून पडून मृत्यू, जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा अपघाती घटनांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक मदत केली जात आहे. यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे; परंतु या योजनेविषयी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये फारशी माहिती नाही. तसेच योजनेसाठी प्रस्ताव पाठविल्यास त्यात मोठा कालावधी लागतो. त्यामुळे सदरील योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक शेतकरी प्रस्ताव पाठवीत नाहीत. 

१ डिसेंबर २०१६ ते ३० नोव्हेंबर २०१७ दरम्यान ७५ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. यात ५१ जणांना लाभ मिळाला असून, २३ जणांच्या प्रस्तावात कागदपत्रांच्या त्रुटी सांगून नाकारण्यात आले आहे. ८ डिसेंबर २०१७ ते ७ डिसेंबर २०१८ या वर्षभरात १०५ जणांपैकी ६४ जणांना लाभ तर १५ जणांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. तर ११ प्रस्ताव प्रलंबित आहेत. ८ डिसेंबर २०१८ ते ७ डिसेंबर २०१९ या कालावधीत ११८ जणांनी प्रस्ताव पाठविले होते. पैकी २६ जणांना लाभ, तर ५२ प्रस्ताव प्रलंबित तर ३९ प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. चालू वर्षात आलेले ५० प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

जनजागृतीबाबत कृषी विभागाचे दुर्लक्षअपघाती मृत्यू अथवा दोन डोळे, दोन अवयव निकामी होणे, एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळतात. तर अपघातामुळे एक डोळा किंवा एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये मिळतात. मागील दीड वर्षापूर्वी घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील शेतकरी कुटुंबातील कृष्णा दत्ता बिडवे (२०) याचा काळेगाव येथे अपघात झाला होता. यात कृष्णाचा मृत्यू झाला; परंतु आम्हाला  गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेची माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला सदरील योजनेसाठी प्रस्ताव पाठविता आला नसल्याची माहिती मयत कृष्णाचा लहान भाऊ प्रशांत बिडवे याने दिली.

टॅग्स :FarmerशेतकरीDeathमृत्यूJalanaजालना