शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

ज्वारीवरील लष्करी अळीने शेतकरी झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:17 IST

मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदाचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकटाचे ठरले. खरिप हंगामात पाऊस नसल्याने उत्पादन घटले असून, नंतर हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शासनाकडून हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते. अनेक शेतकऱ्यांनी याची काळजी घेतली. परंतु मोठ्या प्रमाणावर हा हल्ला झाल्याने ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप आणि रबी हंगामातही पाहिजे तेवढे उत्पन्न मिळणार नसल्याचे वास्तव आहे. यामुळे शेतक-यांची दुहेरी कोंडी झाली आहे. यंदा सोयाबीनचा दर्जाही घटल्याने भाव पाहिजे तेवढा मिळत नसल्याने मिळेल त्या दराने शेतकरी सोयाबीन विक्री करत आहे. काही मोजक्या शेतक-यांकडे आता सोयाबीन शिल्लक असून, ज्यांच्याकडे दर्जेदार सोयाबीन आहे, अशा शेतकºयांना तीन हजार ४०० ते तीन हजार ७०० रूपयांचा दर मिळत आहे.जालना जिल्ह्यात सीसीआयने चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रावर आता कपाशीची चांगली आवक आली असल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी ठाकरे यांनी दिली.दरम्यान, अद्याप शेतात मोठ्या प्रमाणावर कापूस वेचणीअभावी पडून आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद तसेच खासगी संस्थांमधील विद्यार्थी हे शाळेत येण्याऐवजी थेट शेतात जाऊन कापूस वेचत असल्याने शाळेच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.४१८ कोटीची गरजजालना जिल्ह्यातील परतीच्या पावसाने जवळपास चार लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना जुन्या निकषानुसार जरी मदत द्यायची असली तरी त्याची रक्कम ही जवळपास ४१८ कोटी रूपये होते. या पैकी पहिला हप्ता म्हणून केवळ ११० कोटी रूपयेच मिळाले असून, उर्वरित रक्कम कधी मिळेल, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी