शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

ज्वारीवरील लष्करी अळीने शेतकरी झाले हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 01:17 IST

मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : यंदाचे वर्ष हे शेतकऱ्यांसाठी मोठे संकटाचे ठरले. खरिप हंगामात पाऊस नसल्याने उत्पादन घटले असून, नंतर हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावला आहे. त्यामुळे शासनाकडून हेक्टरी २५ हजार रूपयांची मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान मका पिकावर या अळीचा प्रादुर्भाव झाल्याने तो ज्वारीवर येणार हे कृषी विभागासह कृषी शास्त्रज्ञांनी यापूर्वीच सांगितले होते. अनेक शेतकऱ्यांनी याची काळजी घेतली. परंतु मोठ्या प्रमाणावर हा हल्ला झाल्याने ज्वारीचे मोठे नुकसान झाले आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा खरीप आणि रबी हंगामातही पाहिजे तेवढे उत्पन्न मिळणार नसल्याचे वास्तव आहे. यामुळे शेतक-यांची दुहेरी कोंडी झाली आहे. यंदा सोयाबीनचा दर्जाही घटल्याने भाव पाहिजे तेवढा मिळत नसल्याने मिळेल त्या दराने शेतकरी सोयाबीन विक्री करत आहे. काही मोजक्या शेतक-यांकडे आता सोयाबीन शिल्लक असून, ज्यांच्याकडे दर्जेदार सोयाबीन आहे, अशा शेतकºयांना तीन हजार ४०० ते तीन हजार ७०० रूपयांचा दर मिळत आहे.जालना जिल्ह्यात सीसीआयने चार ठिकाणी कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत. या केंद्रावर आता कपाशीची चांगली आवक आली असल्याची माहिती सीसीआयचे अधिकारी ठाकरे यांनी दिली.दरम्यान, अद्याप शेतात मोठ्या प्रमाणावर कापूस वेचणीअभावी पडून आहे. त्यामुळे आजही ग्रामीण भागातील जिल्हा परिषद तसेच खासगी संस्थांमधील विद्यार्थी हे शाळेत येण्याऐवजी थेट शेतात जाऊन कापूस वेचत असल्याने शाळेच्या उपस्थितीवर त्याचा परिणाम होत असल्याचे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.४१८ कोटीची गरजजालना जिल्ह्यातील परतीच्या पावसाने जवळपास चार लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना जुन्या निकषानुसार जरी मदत द्यायची असली तरी त्याची रक्कम ही जवळपास ४१८ कोटी रूपये होते. या पैकी पहिला हप्ता म्हणून केवळ ११० कोटी रूपयेच मिळाले असून, उर्वरित रक्कम कधी मिळेल, याकडे शेतकºयांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी