शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:29 IST

तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीची कामे करताना दिसत असून, कृषी विभागाने यावर्षी साडेपाच लाख हेक्टरवर खरीप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.जिल्ह्यात सतत चार वर्षापासून कमी पर्जन्यमान, दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे यातून होरपळलेला शेतकरी कंबर कसून खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, ठिबक संच खरेदीसाठी लगबग चालू आहे.यावर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाचे बियाणे खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे बँकाही पीककर्ज देत नसल्याने शेतकरी हैराण झाला असून, उसनवारी करुन शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेती मशागतीला लागला आहे.पारा : तीव्र उन्हाचा कामांना फटका१ मेपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४१ ते ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला आहे. पारा ४१ ते ४३ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे.साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापूर्वीपासून बळीराजा खरिपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदी कामे तो करीत असतो. परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMonsoon Specialमानसून स्पेशल