शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

पेरणीपूर्व मशागतीच्या कामात बळीराजा मग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 00:29 IST

तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तीन वर्षांपासून कमी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले असले तरी ते नव्या उमेदीने कंबर कसून खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत. सध्या जिल्ह्यातील शेतकरी शेती मशागतीची कामे करताना दिसत असून, कृषी विभागाने यावर्षी साडेपाच लाख हेक्टरवर खरीप लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे.जिल्ह्यात सतत चार वर्षापासून कमी पर्जन्यमान, दुष्काळी परिस्थिती, पिकांना भाव नसणे यातून होरपळलेला शेतकरी कंबर कसून खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. जिल्ह्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला असून, ठिबक संच खरेदीसाठी लगबग चालू आहे.यावर्षी जिल्ह्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यात पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरीप हंगामाचे बियाणे खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे बँकाही पीककर्ज देत नसल्याने शेतकरी हैराण झाला असून, उसनवारी करुन शेतकरी बियाणे खरेदी करण्याच्या तयारीत आहे. यंदा चांगला पाऊस पडेल या आशेने शेतकरी शेती मशागतीला लागला आहे.पारा : तीव्र उन्हाचा कामांना फटका१ मेपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. ४१ ते ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान राहत आहे. त्यामुळे शेती मशागतीच्या कामांना फटका बसला आहे. पारा ४१ ते ४३ अंशांवर गेल्याने अंगाची लाहीलाही होऊ लागली आहे.सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उष्ण वाऱ्यांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांचीही तीच अवस्था आहे.साधारणत: जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग नक्षत्राला सुरुवात होते. त्याआधी महिनाभरापूर्वीपासून बळीराजा खरिपासाठी सज्ज होत असतो. शेतात खत टाकणे, नांगरणी करणे, शेतातील तणाचा नायनाट करण्यासाठी वरखणी करणे आदी कामे तो करीत असतो. परंतु यंदा उष्णतेमुळे जिल्ह्यात शेती मशागतीची कामे खोळंबली आहेत. शेतकरी पहिल्या पावसाची वाट पाहत आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMonsoon Specialमानसून स्पेशल