शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

शेतकऱ्यांनो घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप मानसिकता बदला – अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 21:19 IST

शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला.

जालना - शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले. लोकशाहीमध्ये कुणाला निवडून दयायचे हा अधिकार जनतेचा असतो. परंतु लोकशाहीमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांनी आज काय अवस्था केली आहे. सरकार नुसत्या घोषणा करत आहे. कृती तर काहीच करत नाही असा आरोप करतानाच केंद्रात, राज्यात ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना दयायला पैसे का नाही असा सवालही सरकारला केला.

माझ्या शेतकऱ्याला, कामगाराला आणि सुशिक्षित वर्गालाही हे सरकार फसवत आहे. तुमचे आमचे खिसे कापण्याचा आणि लुटण्याचा प्रकार हे सरकार करत असून शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन अजितदादांनी केले.

प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे म्हणजेच भ्रष्टाचार नाही का ? - जयंत पाटील

आमच्या सरकारच्या काळात मोठमोठया धरण प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून भ्रष्टाचार झाला असा शोध भाजपच्या लोकांनी लावला होता आणि खोटे आरोपही केले होते आणि आता त्यांच्याच राज्यात ३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मग हा भ्रष्टाचार नाही का असा सवाल विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत सरकारला केला.

३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता सरकारने दिली. ४० हजार कोटी रुपये सरकारने वाढवून दिले म्हणजे हा भ्रष्टाचार झाला आहे. जर मंत्रिमंडळाने या प्रकल्पांना मान्यता दिली असेल तर संपूर्ण मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी आहे असा आरोप जयंत पाटील यांनी सभेत केला. सहकार,शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम स्वर्गीय अंकुशराव टोपेसाहेबांनी केले असून त्यांच्या कामाचा आदर्श त्यांचे चिरंजीव राजेशभैय्या करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी सभेमध्ये या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन जनतेला केले.

साडेतीन वर्ष झाली तरी भाजप सरकारने दिलेली किमान आश्वासने पूर्ण होत नाहीत ही चिंतेची गोष्ट असल्याचे सांगतानाच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनातून या सरकारला खाली खेचूया असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. सभेमध्ये महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदीप सोळंके यांची भाषणे झाली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री व विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार गणेश दुधगावकर, आमदार जयदेव गायकवाड, आमदार अमरसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कादीर मौलाना, राष्ट्रवादी वक्ता सेलचे राज्यप्रमुख प्रदीप सोळंके, राष्ट्रवादी लीग सेलचे राज्यप्रमुख भगवानराव साळुंखे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, घनसावंगीच्या नगराध्यक्षा सौ.योजना देशमुख आदी उपस्थित होते

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस