शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनो घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप मानसिकता बदला – अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 21:19 IST

शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला.

जालना - शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले. लोकशाहीमध्ये कुणाला निवडून दयायचे हा अधिकार जनतेचा असतो. परंतु लोकशाहीमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांनी आज काय अवस्था केली आहे. सरकार नुसत्या घोषणा करत आहे. कृती तर काहीच करत नाही असा आरोप करतानाच केंद्रात, राज्यात ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना दयायला पैसे का नाही असा सवालही सरकारला केला.

माझ्या शेतकऱ्याला, कामगाराला आणि सुशिक्षित वर्गालाही हे सरकार फसवत आहे. तुमचे आमचे खिसे कापण्याचा आणि लुटण्याचा प्रकार हे सरकार करत असून शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन अजितदादांनी केले.

प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे म्हणजेच भ्रष्टाचार नाही का ? - जयंत पाटील

आमच्या सरकारच्या काळात मोठमोठया धरण प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून भ्रष्टाचार झाला असा शोध भाजपच्या लोकांनी लावला होता आणि खोटे आरोपही केले होते आणि आता त्यांच्याच राज्यात ३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मग हा भ्रष्टाचार नाही का असा सवाल विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत सरकारला केला.

३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता सरकारने दिली. ४० हजार कोटी रुपये सरकारने वाढवून दिले म्हणजे हा भ्रष्टाचार झाला आहे. जर मंत्रिमंडळाने या प्रकल्पांना मान्यता दिली असेल तर संपूर्ण मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी आहे असा आरोप जयंत पाटील यांनी सभेत केला. सहकार,शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम स्वर्गीय अंकुशराव टोपेसाहेबांनी केले असून त्यांच्या कामाचा आदर्श त्यांचे चिरंजीव राजेशभैय्या करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी सभेमध्ये या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन जनतेला केले.

साडेतीन वर्ष झाली तरी भाजप सरकारने दिलेली किमान आश्वासने पूर्ण होत नाहीत ही चिंतेची गोष्ट असल्याचे सांगतानाच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनातून या सरकारला खाली खेचूया असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. सभेमध्ये महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदीप सोळंके यांची भाषणे झाली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री व विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार गणेश दुधगावकर, आमदार जयदेव गायकवाड, आमदार अमरसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कादीर मौलाना, राष्ट्रवादी वक्ता सेलचे राज्यप्रमुख प्रदीप सोळंके, राष्ट्रवादी लीग सेलचे राज्यप्रमुख भगवानराव साळुंखे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, घनसावंगीच्या नगराध्यक्षा सौ.योजना देशमुख आदी उपस्थित होते

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस