शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

शेतकऱ्यांनो घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप मानसिकता बदला – अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2018 21:19 IST

शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला.

जालना - शेतकऱ्यांनो आपल्या घरात आर्थिक सुबत्ता नांदण्यासाठी काळानुरुप तुमची मानसिकता बदला. त्यासाठी लागणारी कोणतीही मदत करण्यास आम्ही तयार आहोत असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत शेतकऱ्यांना दिले. लोकशाहीमध्ये कुणाला निवडून दयायचे हा अधिकार जनतेचा असतो. परंतु लोकशाहीमध्ये ज्यांना तुम्ही निवडून दिले त्यांनी आज काय अवस्था केली आहे. सरकार नुसत्या घोषणा करत आहे. कृती तर काहीच करत नाही असा आरोप करतानाच केंद्रात, राज्यात ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना दयायला पैसे का नाही असा सवालही सरकारला केला.

माझ्या शेतकऱ्याला, कामगाराला आणि सुशिक्षित वर्गालाही हे सरकार फसवत आहे. तुमचे आमचे खिसे कापण्याचा आणि लुटण्याचा प्रकार हे सरकार करत असून शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या या सरकारला त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन अजितदादांनी केले.

प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देणे म्हणजेच भ्रष्टाचार नाही का ? - जयंत पाटील

आमच्या सरकारच्या काळात मोठमोठया धरण प्रकल्पांच्या किंमती वाढल्या म्हणून भ्रष्टाचार झाला असा शोध भाजपच्या लोकांनी लावला होता आणि खोटे आरोपही केले होते आणि आता त्यांच्याच राज्यात ३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मग हा भ्रष्टाचार नाही का असा सवाल विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांनी घनसावंगीच्या जाहीर सभेत सरकारला केला.

३०७ प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता सरकारने दिली. ४० हजार कोटी रुपये सरकारने वाढवून दिले म्हणजे हा भ्रष्टाचार झाला आहे. जर मंत्रिमंडळाने या प्रकल्पांना मान्यता दिली असेल तर संपूर्ण मंत्रीमंडळ भ्रष्टाचारी आहे असा आरोप जयंत पाटील यांनी सभेत केला. सहकार,शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श काम स्वर्गीय अंकुशराव टोपेसाहेबांनी केले असून त्यांच्या कामाचा आदर्श त्यांचे चिरंजीव राजेशभैय्या करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले. सभेमध्ये विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचेही भाषण झाले. त्यांनी सभेमध्ये या सरकारला खाली खेचण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन जनतेला केले.

साडेतीन वर्ष झाली तरी भाजप सरकारने दिलेली किमान आश्वासने पूर्ण होत नाहीत ही चिंतेची गोष्ट असल्याचे सांगतानाच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनातून या सरकारला खाली खेचूया असे आवाहन राजेश टोपे यांनी केले. सभेमध्ये महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदीप सोळंके यांची भाषणे झाली. या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, माजी मंत्री व विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी खासदार गणेश दुधगावकर, आमदार जयदेव गायकवाड, आमदार अमरसिंह पंडीत, आमदार विक्रम काळे, आमदार सतिष चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष कादीर मौलाना, राष्ट्रवादी वक्ता सेलचे राज्यप्रमुख प्रदीप सोळंके, राष्ट्रवादी लीग सेलचे राज्यप्रमुख भगवानराव साळुंखे, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, घनसावंगीच्या नगराध्यक्षा सौ.योजना देशमुख आदी उपस्थित होते

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस