शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘एसबीआय’समोर शेतकऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 00:30 IST

खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले

लोकमत न्यूज नेटवर्कवडीगोद्री : खरीप हंगाम सुरू होऊन महिना लोटला तरी वडीगोद्री येथील भारतीय स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेच्या वतीने अनेकांना पीककर्जाचे वाटप झालेले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी या शाखेसमोर घोषणाबाजी करीत आंदोलन केले. तसेच बँक व्यवस्थापकाच्या दालनातच ठिय्या मांडला होता.अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे स्टेट बँक आॅफ इंडियाची शाखा आहे. या बँकेतून कर्जमाफीनंतर पात्र शेतक-यांना पीककर्ज मिळालेले नाही. पीककर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारून थकले आहेत. त्यात पीककर्ज वाटप होत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.बँक मनमानी कारभार करीत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांनी बुधवारी सकाळीच बँकेत आंदोलन केले. यावेळी संबंधित अधिका-यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत होती. मात्र, शेतक-यांनी पीककर्ज वाटपाची प्रक्रिया सुरू होईपर्यंत दालनातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतर संबंधित अधिका-याने आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शेतकरी पंडित गावडे, राधाकिशन मैंद, पांडुरंग गटकळ, भागवत तारख, जन्मजय उढाण, उमेश बर्वे, राजेंद्र सोळुंके, सचिन चोरमले, राजेंद्र खटके, पांडुरंग गावडे, अरुणराव रत्नपारखे, ताराचंद पवार, गणेश गावडेसह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :agitationआंदोलनFarmerशेतकरीCrop Loanपीक कर्ज