शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

जालन्यात कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 18:39 IST

शासनाने कर्जमाफी दिली असली तरी पवार यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही.

तळणी (जालना ) : नापिकीला कंटाळून  आणि कर्जमाफीचा लाभ न मिळाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली. मुरलीधर हिंमतराव पवार (४३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

मंठा तालुक्यातील बेलोरा येथील मुरलीधर पवार यांच्याकडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे ७९ हजारांचे पीककर्ज होते. गेल्या वर्षी मुलीचे लग्न केल्याने बँकेचे कर्ज फेडता आले नाही. कर्जाची रक्कम वाढत गेली. यंदाही शेतातून उत्पन्न निघाले नाही. शासनाने कर्जमाफी दिली असली तरी पवार यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे ते नैराश्यात होते. कर्ज कसे फेडणार याच चिंतेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात  आई- वडील, पत्नी, दोन मुले व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

कर्जमाफीचा लाभ नाहीयाबाबत महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे शाखाधिकारी बुधवंत यांना विचारले असता, मुरलीधर पवार यांच्याकडे ७९ हजारांचे पीककर्ज आहे. त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नसल्याचे बुधवंत यांनी सांगितले.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र