शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
2
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
3
ट्रम्पच्या ५०% टॅरिफने भारतीय उद्योगात खळबळ, पण आनंद महिंद्रांना दिसली 'संधी', दिले २ महत्त्वाचे सल्ले!
4
५० टक्के ट्रम्प टॅरिफचा वार, भारत कसा करणार बचाव? ७ पर्याय अजून खुले; अमेरिका गुडघे टेकेल!
5
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
6
संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट...
7
शरद पवार गटात नवे प्रदेशाध्यक्ष केवळ नामधारी? शशिकांत शिंदे नाही, रोहित पवारच अधिक सक्रिय
8
"पप्पा, मी वाचणार नाही...", मुलाचा अखेरचा कॉल; उत्तरकाशीतील दुर्घटनेनं दिली आयुष्यभराची जखम
9
"गरज असेल तर मी टक्कलही करेन...", कामातील कमिटमेंटबद्दल अभिनेत्री स्पष्टच बोलली
10
भारतानं रशियासोबत असं काही केलं की ट्रम्प यांचा होईल तिळपापड; अमेरिकेच्या दुखत्या नसेवर हात ठेवला का?
11
ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल...
12
TCS मध्ये मोठा निर्णय! १ सप्टेंबरपासून पगार वाढणार, पण 'या' १२,००० कर्मचाऱ्यांची धडधड वाढली!
13
८ डावात फक्त एक फिफ्टी! टेस्टमध्ये 'नापास'चा ठपका; आता करुण नायर या मोठ्या स्पर्धेतून OUT
14
२०१८ मध्ये बनला उड्डाणपूल, २७ कोटींचा खर्च; अवघ्या ६ वर्षात BMC करणार जमीनदोस्त, कारण काय?
15
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
16
Trump Tariff News Apple Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांपुढे झुकले टीम कुक; ₹८७७७३२ कोटींची गुंतवणूक, Apple ची मोठी घोषणा
17
आकाशात उडत होतं विमान, अचानक धडकला मोठा पक्षी; विमानाचं मोठं नुकसान, प्रवासी थोडक्यात बचावले!
18
ट्रम्प टॅरिफनंतर शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex २८१ अंक आणि Nifty ११० अंकांच्या घसरणीसह उघडले; 'यांना' सर्वाधिक नुकसान
19
जान्हवी कपूरचा संताप, ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याच्या निर्णयावर केली टीका
20
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद

१३ दिवसाला एक आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:07 IST

२००१ ते २०१८ या १८ वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह््यात ४९१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : २००१ ते २०१८ या १८ वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह््यात ४९१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. यापैकी ३९० प्रकरणांत आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली. यापैकी ९२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. दरम्यान, १३ दिवसाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले.लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतक-याच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागला आहे. त्यामुळे परिस्थितीला कंटाळून शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांपासून या आकडेवारीत भरच पडत असून, मागील १८ वर्षात जिल्ह्यातील ४९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे.आत्महत्याचे सत्र दरवर्षी वाढत आहे. २००१ साली १, २००२-०३ मध्ये आत्महत्या नाही. २००४ मध्ये १६, २००५ मध्ये ५, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये २५, २००८ मध्ये २०, २००९ मध्ये २, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये ६, २०१३ मध्ये ८, २०१४ मध्ये ३२, २०१५ मध्ये ८३, २०१६ मध्ये ७६, २०१७ मध्ये ९१, २०१८ मध्ये ७७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैर्वी आहे. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी शासनाने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होत आहे. यासाठी शासाने किमान आतातरी ठोस उपाय करण्याची मागणी होत आहे.शेतक-यांना एक लाखाची मदतनापिकी, कर्जबाजारीपणा, राष्टÑीयीकृत बँका अथवा मान्यताप्राप्त सावकारी कर्ज असल्याचे सिद्ध झाल्यास आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांना सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. कृषी विभाग आणि अन्य योजनांमध्ये पीडित कुटुंबाला प्राधान्य द्यावे, अशाही सरकारच्या सूचना आहेत.कर्जबाजारीपणास कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्याजिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत.२०१७ मध्ये ४ दिवसाला एक आत्महत्या२०१७ मध्ये पाऊस मुबलक प्रमाणात असतानाही सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१७ वर्षात ९१ शेतक-यांनी आपली जीवन यात्रा संपवली. तर ४ दिवसात एका शेतक-यांने आत्महत्या केली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारला आणखी उपायायोजना करण्याची गरज आहे.लक्ष देण्याची गरजदिवसेंदिवस शेतक-यांच्या आत्महत्ये वाढ होत आहे. याकडे राज्य शासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकºयांच्या हाताला काम देणे, त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, सावकारी बंद करणे यासह विविध कामे करण्याची गरज आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र