शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

१३ दिवसाला एक आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:07 IST

२००१ ते २०१८ या १८ वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह््यात ४९१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे.

दीपक ढोले ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : २००१ ते २०१८ या १८ वर्षाच्या कालावधीत जालना जिल्ह््यात ४९१ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. यापैकी ३९० प्रकरणांत आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत करण्यात आली. यापैकी ९२ प्रकरणे अपात्र ठरविण्यात आली आहे. दरम्यान, १३ दिवसाला एक शेतकरी आत्महत्या करत असल्याचे समोर आले.लहरी हवामान, मान्सूनच्या चुकलेल्या अंदाजामुळे निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतक-याच्या पदरी दरवर्षी निराशाच पडू लागल्याने त्यांच्यावर कर्जाचा डोंगर दरवर्षी मोठा होऊ लागला आहे. त्यामुळे परिस्थितीला कंटाळून शेतक-यांनी आत्महत्येचा मार्ग जवळचा म्हणून पत्करला. गेल्या काही वर्षांपासून या आकडेवारीत भरच पडत असून, मागील १८ वर्षात जिल्ह्यातील ४९१ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहे.आत्महत्याचे सत्र दरवर्षी वाढत आहे. २००१ साली १, २००२-०३ मध्ये आत्महत्या नाही. २००४ मध्ये १६, २००५ मध्ये ५, २००६ मध्ये ३९, २००७ मध्ये २५, २००८ मध्ये २०, २००९ मध्ये २, २०१० मध्ये ४, २०११ मध्ये ६, २०१२ मध्ये ६, २०१३ मध्ये ८, २०१४ मध्ये ३२, २०१५ मध्ये ८३, २०१६ मध्ये ७६, २०१७ मध्ये ९१, २०१८ मध्ये ७७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.दरवर्षी शेतकरी आत्महत्यांचा आलेख वाढताच असल्याचे चित्र दुदैर्वी आहे. निराशेच्या गर्तेमधून शेतकरी सावरावा व त्यांचा आर्थिक स्तर उंचावा, यासाठी शासनाने विविध उपाय योजना करण्यात येत आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी हैराण होत आहे. यासाठी शासाने किमान आतातरी ठोस उपाय करण्याची मागणी होत आहे.शेतक-यांना एक लाखाची मदतनापिकी, कर्जबाजारीपणा, राष्टÑीयीकृत बँका अथवा मान्यताप्राप्त सावकारी कर्ज असल्याचे सिद्ध झाल्यास आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या वारसांना सरकारकडून एक लाख रुपयांची मदत दिली जाते. कृषी विभाग आणि अन्य योजनांमध्ये पीडित कुटुंबाला प्राधान्य द्यावे, अशाही सरकारच्या सूचना आहेत.कर्जबाजारीपणास कंटाळून शेतक-यांच्या आत्महत्याजिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळूनच शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे आजवरच्या चौकशीतून पुढे आले आहे. दरमहा साधारणत: सहा ते सात शेतकरी आत्महत्या करीत आहेत.२०१७ मध्ये ४ दिवसाला एक आत्महत्या२०१७ मध्ये पाऊस मुबलक प्रमाणात असतानाही सर्वाधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१७ वर्षात ९१ शेतक-यांनी आपली जीवन यात्रा संपवली. तर ४ दिवसात एका शेतक-यांने आत्महत्या केली आहे. आत्महत्या रोखण्यासाठी सरकारला आणखी उपायायोजना करण्याची गरज आहे.लक्ष देण्याची गरजदिवसेंदिवस शेतक-यांच्या आत्महत्ये वाढ होत आहे. याकडे राज्य शासनाला उपाययोजना करण्याची गरज आहे. शेतकºयांच्या हाताला काम देणे, त्यांच्या मुलांना शिक्षण देणे, सावकारी बंद करणे यासह विविध कामे करण्याची गरज आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याdroughtदुष्काळAgriculture Sectorशेती क्षेत्र