शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

शेततळ्यांचे उद्दिष्ट ‘ओव्हरफ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:52 IST

मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे.

संजय देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागेल त्याला शेततळे योजने अंतर्गत जालना जिल्ह्याला सहा हजार शेततळे निर्मितीचे उद्दिष्ट दिले होते. परंतु त्यापेक्षा जास्त कामे जिल्ह्यात झाल्याचे कृषी विभागाने नमूद केले आहे. यामुळे सिंचन क्षमतावाढीसह शाश्वत उत्पन्न घेण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे. असे असले तरी यंदा कमी पाऊस पडल्याने या शेततळ्यात जेमतेम पाणीसाठा आहे.मागेल त्याला शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून ५० हजार रूपयांचे अनुदान देण्यात येते. जिल्ह्यात यंदा सहा हजार शेततळी व्हावित असे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. परंतु अर्जांची संख्या जास्त आल्याने त्यांना ही कामे करण्यासाठी मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यातील शेततळ्यांचे जवळपास एक हजार शेततळ्याचे अनुदान लेखा परीक्षकांच्या आक्षेपामुळे थकले आहे. हे अनुदानही लवकरच वितरित करण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.जालना जिल्हा सिंचनाच्या अनुशेषाबाबत अद्यापही कोसो दूर आहेत, त्यामुळे शेततळे, आहे ते पाणी ठिबक सिंचनाव्दारे देणे इ. कामांना प्राधान्य दिले जात आहे.केंद्र आणि राज्य सरकारकडून सूक्ष्मसिंचन अर्थात ठिबक सिंचनासाठी देखील भरीव अनुदान दिले जात असल्याने ठिबक संच बसविण्यावर शेतक-यांचा भर आहे. यामुळे अधिकाधिक शेती सिंचनाखाली येणार आहे.दहा कोटी अनुदान प्राप्तठिबक सिंचनाचे केंद्र आणि राज्य सरकारचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यात केंद्र सरकारचे सहा कोटी रूपये मिळाले होते, पैकी चार कोटी रूपयांचे अनुदान संबंधित पात्र शेतक-यांच्या खात्यावर वर्ग केले आहे. तर राज्य सरकारचे चार कोटी रूपयांचे अनुदान दिवाळीनंतर मिळाले होते. त्यापैकी जवळपास अडीच कोटी रूपये शेतक-यां देण्यात आले आहेत.- विजय माईनकर,कृषी अधीक्षक जालना

टॅग्स :government schemeसरकारी योजनाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी