शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
5
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
7
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
8
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
9
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
10
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
12
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
13
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
14
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
15
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
16
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
17
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
18
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
19
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
20
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नारळ देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:32 IST

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. जालना जिल्ह्यातील जवळपास ५३ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारीत केला आहे. त्याची अंमलबजाणी १ एप्रिल २०१० पासून सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने २३ आॅगस्ट २०१० व २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, सर्व शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.या शिक्षकांना ३० मार्च २०१९ अखेरपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. अन्यथा त्यांच्या सेवा समाप्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार २०१३ पासूून टीईटी व सीटीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस बसण्यास शिक्षकांना संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, तरीही काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही. त्यामुळे २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर शहानिशा करून त्यांच्या सेवा समाप्ती बाबतचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेतील अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सेवा संबंधीत शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी, असेही निर्देश आहेत. संस्थांनी या शिक्षकांच्या सेवा यापुढेही सुरू ठेवल्यास १ जानेवारी २०२० पासून त्यांना शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील जवळपास ६० ते ६५ शिक्षकांची नियुक्ती २०१३ नंतर करण्यात आलेली आहे. त्यापैकी ५३ शिक्षकांनी टीईटी दिलेली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यात विनाअनुदानित २५ तर जि.प. शाळेतील २८ शिक्षकांचा समावेश आहे.दरम्यान, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांंच्या सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाले असून, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षकjobनोकरी