शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नारळ देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:32 IST

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. जालना जिल्ह्यातील जवळपास ५३ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारीत केला आहे. त्याची अंमलबजाणी १ एप्रिल २०१० पासून सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने २३ आॅगस्ट २०१० व २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, सर्व शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.या शिक्षकांना ३० मार्च २०१९ अखेरपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. अन्यथा त्यांच्या सेवा समाप्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार २०१३ पासूून टीईटी व सीटीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस बसण्यास शिक्षकांना संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, तरीही काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही. त्यामुळे २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर शहानिशा करून त्यांच्या सेवा समाप्ती बाबतचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेतील अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सेवा संबंधीत शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी, असेही निर्देश आहेत. संस्थांनी या शिक्षकांच्या सेवा यापुढेही सुरू ठेवल्यास १ जानेवारी २०२० पासून त्यांना शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील जवळपास ६० ते ६५ शिक्षकांची नियुक्ती २०१३ नंतर करण्यात आलेली आहे. त्यापैकी ५३ शिक्षकांनी टीईटी दिलेली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यात विनाअनुदानित २५ तर जि.प. शाळेतील २८ शिक्षकांचा समावेश आहे.दरम्यान, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांंच्या सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाले असून, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षकjobनोकरी