शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नारळ देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:32 IST

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. जालना जिल्ह्यातील जवळपास ५३ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारीत केला आहे. त्याची अंमलबजाणी १ एप्रिल २०१० पासून सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने २३ आॅगस्ट २०१० व २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, सर्व शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.या शिक्षकांना ३० मार्च २०१९ अखेरपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. अन्यथा त्यांच्या सेवा समाप्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार २०१३ पासूून टीईटी व सीटीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस बसण्यास शिक्षकांना संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, तरीही काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही. त्यामुळे २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर शहानिशा करून त्यांच्या सेवा समाप्ती बाबतचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेतील अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सेवा संबंधीत शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी, असेही निर्देश आहेत. संस्थांनी या शिक्षकांच्या सेवा यापुढेही सुरू ठेवल्यास १ जानेवारी २०२० पासून त्यांना शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील जवळपास ६० ते ६५ शिक्षकांची नियुक्ती २०१३ नंतर करण्यात आलेली आहे. त्यापैकी ५३ शिक्षकांनी टीईटी दिलेली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यात विनाअनुदानित २५ तर जि.प. शाळेतील २८ शिक्षकांचा समावेश आहे.दरम्यान, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांंच्या सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाले असून, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षकjobनोकरी