शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
2
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
3
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
4
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
5
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
7
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
8
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
9
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
10
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
11
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
12
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
13
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
14
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
15
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
16
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
17
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
18
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
19
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
20
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना नारळ देणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:32 IST

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे निर्देश शिक्षण संचालकांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. जालना जिल्ह्यातील जवळपास ५३ शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नसल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.केंद्र शासनाने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ पारीत केला आहे. त्याची अंमलबजाणी १ एप्रिल २०१० पासून सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेने २३ आॅगस्ट २०१० व २९ जुलै २०११ च्या अधिसूचनेनुसार प्राथमिक शिक्षकांकरिता किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली असून, सर्व शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्य केली आहे. १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्त प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे.या शिक्षकांना ३० मार्च २०१९ अखेरपर्यंत टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले होते. अन्यथा त्यांच्या सेवा समाप्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्यानुसार २०१३ पासूून टीईटी व सीटीईटी परीक्षांचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेस बसण्यास शिक्षकांना संधीही उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु, तरीही काही शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिली नाही. त्यामुळे २०१३ नंतर नियुक्त शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर शहानिशा करून त्यांच्या सेवा समाप्ती बाबतचे आदेश निर्गमित करण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचना जालना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला देण्यात आल्या आहेत. खाजगी शिक्षण संस्थेतील अनुदानित व विना अनुदानित शिक्षकांच्या सेवा समाप्तीची कार्यवाही सेवा संबंधीत शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या स्तरावर करावी, असेही निर्देश आहेत. संस्थांनी या शिक्षकांच्या सेवा यापुढेही सुरू ठेवल्यास १ जानेवारी २०२० पासून त्यांना शासकीय वेतन अनुदान अनुज्ञेय राहणार नाही. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यातील जवळपास ६० ते ६५ शिक्षकांची नियुक्ती २०१३ नंतर करण्यात आलेली आहे. त्यापैकी ५३ शिक्षकांनी टीईटी दिलेली नाही. त्यामुळे अशा शिक्षकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. यात विनाअनुदानित २५ तर जि.प. शाळेतील २८ शिक्षकांचा समावेश आहे.दरम्यान, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांंच्या सेवा समाप्तीचे आदेश प्राप्त झाले असून, टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची माहिती गोळा करण्याचे काम शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Jalna z pजालना जिल्हा परिषदTeacherशिक्षकjobनोकरी