शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

महायुतीतील चर्चेतील जोडी! रावसाहेब दानवे- अब्दुल सत्तार यांनी एकमेकांना घातली टोपी!

By विजय मुंडे  | Updated: April 27, 2024 19:39 IST

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री अन् वितुष्ट सर्वपचरिचित.

भोकरदन ( जालना) : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो. एकेकाळी दानवे यांचा पराभव केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी प्रतिज्ञा करणारे अब्दुल सत्तार यांनी शनिवारी राजुरेश्वराच्या साक्षीने रावसाहेब दानवे यांच्या प्रचाराचा नारळ फाेडला. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या डोक्यावर टोपी घालत राजकीय मदत करण्याचे जणू वचनच एकमेकांना दिले.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांची राजकीय मैत्री सर्वपचरिचित. मात्र, २०१९ पूर्वी त्यांच्या मैत्रीत वितुष्ट आले होते. त्यावेळी सत्तार हे काँग्रेस पक्षात होते. त्यावेळी त्यांनी दानवे यांचा ''अर्जुना''च्या ''बाणा''ने वध करण्याचा विडा उचलला होता. तेव्हा अर्जुन खोतकर हे भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेत होते. तरीही त्यांनी भोकरदन विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांना सोबत घेऊन दौरे केले होते. शिवाय त्यावेळी त्यांनी डोक्यावर टोपी घातली होती व दानवे यांचा पराभव केल्यावरच डोक्यावरील टोपी काढण्याची शपथ घेतली होती.

मात्र, २०१९ च्या निवडणुकीत दानवे यांना पराभूत करू म्हणणारे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँगेसचा राजीनामा देऊन दानवे यांना एक लाखाचे मताधिक्य दिले होते. त्यानंतर अब्दुल सत्तार हे शिवसेना पक्षात गेले व निवडूनही आले. मात्र, त्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या पक्षाची युती असताना सुध्दा दानवे यांच्यासह भाजपचा कोणताही पदाधिकारी सत्तार यांच्या प्रचारसाठी सहभागी झाला नाही. त्यांनी सर्व ताकद अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांच्या पाठीमागे उभी केली होती. मात्र, सत्तार यांनी स्वबळावर बाजी मारली होती.

सत्तार यांची भूमिका आणि दानवे कार्यकर्त्यांसह भेटीलासत्तर यांना शिवसेना-काँग्रेस- राष्ट्रवादी पक्षाच्या आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर शिवसेना फुटली व ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले. परत भाजप, शिंदे सरकारमध्ये मंत्री झाले. तुम्ही लोकसभेत माझ्याकडून काम करून घेता व विधानसभा निवडणुकीत भाजप कार्यकर्ते माझे काम करीत नाही, आता तसे चालणार नाही, अशी भूमिका सत्तार यांनी घेतली. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडच्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांना २६ एप्रिल रोजी सत्तार यांच्या कार्यालयात नेले व येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युती धर्म पाळण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर २७ एप्रिल रोजी राजूर येथे मंत्री अब्दुल सत्तार, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी सभापती शिवाजी थोटे यांच्यासह अनेक पदाधिकारी व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थित प्रचाराचा नारळ फोडण्यात आला.

टॅग्स :jalna-pcजालनाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४raosaheb danveरावसाहेब दानवेAbdul Sattarअब्दुल सत्तार