शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:30 IST

मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे आवाहन मंठ्यातील जनसंघर्ष यात्रेत एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश कॉगेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी आयोजित केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी व्यासपीठावर ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार, रामप्रसाद बोराडे, रामकिसन ओझा, सुरेश देशमुख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.धोडीराम राठोड, आर.आर. खडके ,भीमराव डोंगरे, तालुका कॉग्रेसचे निळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, किसनराव मोरे ,नितीन जेथलिया आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार प्रत्येक राजकिय कामासाठी समाजाचा वापर करत असुन सर्वसामान्यांना केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवत आहे. आज राफेलचा मुद्दा असो की, सीबीआयचा गोंधळ यामुळे सरकारची छबी डगाळली आहे. राफेल प्रकरणात अद्यापही पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नसल्याचे चव्हाण म्हणाले.दिल्ली येथे भाजपाचे कार्यलय हे एका वर्षात होते आणि महापुरूषांचे पुतळे वषार्नुवर्षे रखडत असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, समाजातील सर्व घटक नाराज असून, जीएसटी मुळे व्यापारी उध्वस्त झाला. शेतकºयांना हमीभावाचे नुसते गाजर दाखवले. रूपया घसरला आहे. डिझेल, पेट्रोल महाग , राज्य सरकारकडे कर्मचाºयांना वेतन अयोग लागू करताना चालढकल केली जात असल्याचे चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. दुष्काळ निवारणासाठी कुठलीच ठोस उपाययोजना सरकारने केली नसल्याचा आरोप ही चव्हाण यांनी केला.सरकार गोंधळून गेले असुन फक्त घोषणा करत फिरत आहेत. महागाई नियंत्रणात न आणल्याने सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. कर्जमाफीच्या गोंधळावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. उज्ज्वला गॅसची योजना म्हणजे मोठी फसवणूक आहे. आॅनलाईनच्या नावावर सरकारने शेतकºयांना फसवले आहे. धार्मिक धुर्वीकरण करत समाजात तेढ निर्माण करण्याची भावना सरकारची असल्याचेही पुथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार यांनीही सरकारच्या एकूणच धोरणांचा समाचार घेतला. तोफीक मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाAshok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा