शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

भाजप सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:30 IST

मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे आवाहन मंठ्यातील जनसंघर्ष यात्रेत एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश कॉगेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी आयोजित केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी व्यासपीठावर ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार, रामप्रसाद बोराडे, रामकिसन ओझा, सुरेश देशमुख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.धोडीराम राठोड, आर.आर. खडके ,भीमराव डोंगरे, तालुका कॉग्रेसचे निळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, किसनराव मोरे ,नितीन जेथलिया आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार प्रत्येक राजकिय कामासाठी समाजाचा वापर करत असुन सर्वसामान्यांना केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवत आहे. आज राफेलचा मुद्दा असो की, सीबीआयचा गोंधळ यामुळे सरकारची छबी डगाळली आहे. राफेल प्रकरणात अद्यापही पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नसल्याचे चव्हाण म्हणाले.दिल्ली येथे भाजपाचे कार्यलय हे एका वर्षात होते आणि महापुरूषांचे पुतळे वषार्नुवर्षे रखडत असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, समाजातील सर्व घटक नाराज असून, जीएसटी मुळे व्यापारी उध्वस्त झाला. शेतकºयांना हमीभावाचे नुसते गाजर दाखवले. रूपया घसरला आहे. डिझेल, पेट्रोल महाग , राज्य सरकारकडे कर्मचाºयांना वेतन अयोग लागू करताना चालढकल केली जात असल्याचे चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. दुष्काळ निवारणासाठी कुठलीच ठोस उपाययोजना सरकारने केली नसल्याचा आरोप ही चव्हाण यांनी केला.सरकार गोंधळून गेले असुन फक्त घोषणा करत फिरत आहेत. महागाई नियंत्रणात न आणल्याने सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. कर्जमाफीच्या गोंधळावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. उज्ज्वला गॅसची योजना म्हणजे मोठी फसवणूक आहे. आॅनलाईनच्या नावावर सरकारने शेतकºयांना फसवले आहे. धार्मिक धुर्वीकरण करत समाजात तेढ निर्माण करण्याची भावना सरकारची असल्याचेही पुथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार यांनीही सरकारच्या एकूणच धोरणांचा समाचार घेतला. तोफीक मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाAshok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा