शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

भाजप सरकारला हद्दपार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 00:30 IST

मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे आवाहन मंठ्यातील जनसंघर्ष यात्रेत एल्गार

लोकमत न्यूज नेटवर्कमंठा : मागील चार वर्षात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे म्हणण्याची वेळ आली असून, हे सरकार नको म्हणण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजप सरकारला आगामी काळात त्यांची जागा दाखवून हद्दपार करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा प्रदेश कॉगेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मंठा येथे सोमवारी आयोजित केले.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा पोहचली होती. यावेळी या यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या संघर्ष यात्रेचे नंतर जाहीर सभेत रूपांतर झाले यावेळी व्यासपीठावर ,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार, रामप्रसाद बोराडे, रामकिसन ओझा, सुरेश देशमुख, जालना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सुरेशकुमार जेथलिया, माजी आ.धोडीराम राठोड, आर.आर. खडके ,भीमराव डोंगरे, तालुका कॉग्रेसचे निळकंठ वायाळ, शहराध्यक्ष शबाब कुरेशी, किसनराव मोरे ,नितीन जेथलिया आदींची उपस्थिती होती.पुढे बोलतांना अशोक चव्हाण म्हणाले की, हे सरकार प्रत्येक राजकिय कामासाठी समाजाचा वापर करत असुन सर्वसामान्यांना केवळ आश्वासनांवर झुलवत ठेवत आहे. आज राफेलचा मुद्दा असो की, सीबीआयचा गोंधळ यामुळे सरकारची छबी डगाळली आहे. राफेल प्रकरणात अद्यापही पंतप्रधान मोदींनी तोंड उघडले नसल्याचे चव्हाण म्हणाले.दिल्ली येथे भाजपाचे कार्यलय हे एका वर्षात होते आणि महापुरूषांचे पुतळे वषार्नुवर्षे रखडत असल्याचे शेवटी बोलतांना सांगितले. याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, समाजातील सर्व घटक नाराज असून, जीएसटी मुळे व्यापारी उध्वस्त झाला. शेतकºयांना हमीभावाचे नुसते गाजर दाखवले. रूपया घसरला आहे. डिझेल, पेट्रोल महाग , राज्य सरकारकडे कर्मचाºयांना वेतन अयोग लागू करताना चालढकल केली जात असल्याचे चव्हाण म्हणाले. नोटाबंदीमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. दुष्काळ निवारणासाठी कुठलीच ठोस उपाययोजना सरकारने केली नसल्याचा आरोप ही चव्हाण यांनी केला.सरकार गोंधळून गेले असुन फक्त घोषणा करत फिरत आहेत. महागाई नियंत्रणात न आणल्याने सामान्य माणूस मेटाकुटीस आला आहे. कर्जमाफीच्या गोंधळावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी टीका केली. उज्ज्वला गॅसची योजना म्हणजे मोठी फसवणूक आहे. आॅनलाईनच्या नावावर सरकारने शेतकºयांना फसवले आहे. धार्मिक धुर्वीकरण करत समाजात तेढ निर्माण करण्याची भावना सरकारची असल्याचेही पुथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री विजय वडीवेट्टीवार यांनीही सरकारच्या एकूणच धोरणांचा समाचार घेतला. तोफीक मुल्लानी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नागरिकांची उपस्थिती होती.

टॅग्स :JalanaजालनाAshok Chavanअशोक चव्हाणCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्रा