शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

उपोषणासाठी सर्वांनी मस्साजोगकडे जायचं, देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी रहा; मनोज जरांगे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 19:34 IST

मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे एखाद शिष्टमंडळ मस्साजोगमध्ये जाण गरजेच: मनोज जरांगे

- पवन पवारवडीगोद्री ( जालना) : देशमुख कुटुंब आमरण उपोषणाला बसण म्हणजे दुर्दैव आहे. देशमुख कुटुंब उपोषणाला बसले तर मी राज्यातील मराठा समाजाला सांगतो की, सगळ्यांनी मस्साजोगकडे जायचं. सगळ्यांनी देशमुख कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहायचं, असे आवाहन मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले. आज दुपारी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

जरांगे पुढे म्हणाले, आज देशमुख कुटुंब संकटात आहे, माणुसकी म्हणून बघायच असेल तर देशमुख कुटुंबाकडे बघावा लागेल. उपोषण साधी गोष्ट नाही, माझी त्यांना विनंती आहे की, उपोषण करू नका. संतोष देशमुख यांची बदनामी करण्यासाठी षडयंत्र रचले होते. ते कोणत्या मंत्र्यांनी करायला लावलं, त्यात एका बाईला आणि पोलिसांना कोणाकोणाचे फोन केले. धनंजय मुंडे यांनी फोन केले का? याचे देखील सीडीआर काढले पाहिजे. यात बडा नेता कोण, बडा नेता कोण हे उघड पडू द्या. मागण्यांची पूर्तता करण्यासाठी सरकारचे एखाद शिष्टमंडळ तिथे जाण गरजेचे आहे, अशी मागणी देखील जरांगे यांनी यावेळी केली. 

मंत्री धनंजय मुंडे आणि आमदार धस यांची भेट झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली होती, मात्र ग्रामस्थांनी धस यांना पाठिंबा जाहीर केला यावर बोलताना जरांगे म्हणाले, त्या विषयात मला काही बोलायचं नाही तो विषय माझ्यासाठी संपला आहे. मी एवढा जीव लावला होता. समाजाने देखील तळ हातावर घेतलं होतं. एवढ्या क्रूर माणसाला जाऊन भेटणं काहीच गरज नाही. तुमच्यावर पक्षाचा दबाव होता तर तुम्ही सर्व सांगायला पाहिजे होतं. मी समाजाची गद्दारी करू शकत नाही. माझ्यावर पक्षाचा दबाव आहे असं आमदार धस यांनी म्हणायला पाहिजे होतं. मी पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा देतो मराठ्यांसाठी पण मी धनंजय मुंडे यांना भेटायला जाऊ शकत नाही. सरळ राजीनामा फेकून द्यायला पाहिजे होता, असा संताप जरांगे पाटील यानी व्यक्त केला.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणDhananjay Mundeधनंजय मुंडेSuresh Dhasसुरेश धस