शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
2
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
3
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
4
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
5
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
6
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
7
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोड्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
8
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
9
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
10
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
11
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
12
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
13
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
15
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
16
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
17
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
18
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
19
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
20
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी घटतेय जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:18 IST

: जिल्ह्यात इंग्रजी तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात इंग्रजी तसेच खासगी शाळांच्या वाढत्या संख्येमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांच्या पटसंख्येत घट होत आहे. जालना जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत कमालीची घट पाहायला मिळत आहे. सन २०१७-१८ मध्ये ७ हजारांनी पटसंख्येत घट झाल्याचे समोर आले.विद्यार्थ्यांचा खासगी व इंग्रजी माध्यमातील शाळांकडे वाढता कल, शिक्षणक्षेत्रात वेगाने होत असलेले बदल, यामुळे जि. प. शाळांना घरघर लागली आहे. अनेक विद्यार्थी हे खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे वळत असले तरी याकडे मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांची संख्याही कमी नाही. ग्रामीण भागामध्ये शेती करणाऱ्यांची संख्या प्रत्येकवर्षी कमी होत चालली आहे. कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतक-यांचे दरवषी उत्पादन कमी होत आहे. त्यामुळे नोकरीनिमित्ताने शहरी भागाकडे प्रमाणही जास्त आहे. या सर्वांचा परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर होत आहे.जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक हे शाळा बाह्य विद्यार्थ्यांचा व स्थंलातरी विद्यार्थ्याचा शोध घेत असतात. चिरेखाणीवरील कामगारांची मुले तसेच रस्ता कामगारांच्या मुलांना शाळेत आणण्यासाठी त्यांच्या पालकांचे शिक्षकांकडून प्रबोधन करण्यात येते. तरीही विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होत नाही. सन १०१५-१६ मध्ये जि.प.च्या शाळेत १ लाख ७६ हजार २८० विद्यार्थ्यांची संख्या होती. २०१६-१७ मध्ये १ लाख ७१ हजार ४१६ झाली.४ हजार ८६४ ने पटसंख्येत घट झाली. तर वर्ष १७-१८ मध्ये १ लाख ६४ हजार ३८१ झाली. यात ७ हजार ३५ विद्यार्थी कमी झाले आहे. त्यामुळे येणाºया काळात जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंर्दभात जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-यांशी संपर्क साधला असता, त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही.घटत्या पटसंख्येमुळे शिक्षक चिंतेतमागील वर्षी तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. यामुळे शिक्षक वर्गामधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.शाळा बंद पडण्याची भीतीजिल्ह्यात १५४५ शाळा आहे. परंतु, दिवसेंदिवस पटसंख्येत घट होत असल्याने जिल्हा परिषदेच्या काही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे.पटसंख्येबाबत राज्य सरकारतर्फे उपाय योजना करण्यात येत आहे. परंतु, स्थानिक पातळीवर उपाय योजना होतांना दिसत नाही. त्यामुळे शिक्षणाधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहेत.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी